राजकुमार यांचे नाव सिंगानाल्लुरु पुत्तस्वमय्या मुथुराज असे होते. परंतू त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अनेक नावे दिली. अभिनयाचे शहंशाह, सोन्याचा माणूस, ब्रदर राज अशा अनेक नावांनी त्यांची ओळख होती. ते चांगले अभिनेता होतेच परंतू त्यासोबत ते चांगले गायकही होते.
राजकुमार यांना भारतीय सिनेमाचा महानायक म्हणून ओळखले जातात. कारण ऍक्टींगग करताना त्यांनी कधीच मद्य आणि धूम्रपानाचे सेवन नाही केले. तसेच त्यांनी कुठल्याच चित्रपटात ‘कसम खाता हू’ सारखे डायलॉगही नाही वापरले. राजकुमार यांचे वैयक्तिक जीवनही चित्रपटांसारखेच रोमांचक होते.
१९५४ साली त्यांचा ‘बेडरा कन्नपा’ हा पहिला चित्रपट आला होता, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी २०० हून अधिक चित्रपट काढले. तसेच त्यांनी ४०० गाणीही गायली आहेत. त्यांना १९८३ साली त्यांना पद्मविभूषणने गौरवण्यात आले. तसेच त्यांना तीन नॅशनल अवॉर्डही मिळाले होते. त्यामधील एक त्यांच्या गाण्यासाठी होता. तसेच दादासाहेब फाळके, फिल्मफेअर अवॉड, कर्नाटक स्टेट फिल्म अवॉड्सनेही त्यांना गौरवण्यात आले होते.
२००० साली चंदन तस्कर वीरप्पनने त्यांचे अपहरण केले होते. १०८ दिवस ते त्याच्या तावडीत होते. २००० साली त्यांचा ‘शब्दवेधी’ हा शेवटचा चित्रपट प्रकाशित झाला. आज भारतीय सिनेमाचे जेम्स बॉंड राजकुमार यांचे गुगलने डूडल बनवून यांना सलाम केला आहे. मा.राजकुमार यांचे १२ एप्रिल २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply