
याविषयी कथा अशी – एकदा गौतमऋषींच्या हातून चुकून गोहत्या झाली. या हत्येचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना केली असता शंकराने मृत गाय तर जिवंत केलीच पण त्यांनी प्रकट केली व ब्रह्म, विष्णूसह महेश तेथेच ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात राहिले. हे ज्योतिर्लिंग खरोखर आगळेवेगळे आहे. कारण इथली पिंड साळुंकेश्वर नसून एका खोलगट भागात अंगुष्ठाप्रमाणे तीन लिंग आहेत. त्यांनाच ब्रह्मा, विष्णू व महेश असं म्हणतात. गंमत म्हणजे फक्त शिवाच्याच पिंडीवर पाणी सारखे झिरपत असते. हे तीर्थ नाशिक जिल्ह्यात आहे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply