नवीन लेखन...

ताळमेळ हवा!

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगातील अनेक देशांनी भारताच्या भवितव्याविषयी काळजी व्यक्त केली होती. विविधतेने नटलेला एवढा मोठा देश भारतीय नेते सांभाळू शकतील की नाही, याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. चर्चिलने तर ब्रिटिश पालर्मेंटमध्ये भारतीय लोक स्वतंत्र राहण्याच्या योग्यतेचे नाही, देशाचा कारभार त्यांना चालवता येणार नाही, 50 वर्षांतच भारताच्या स्वातंत्र्याच्या ठिकऱ्या उडतील, असे परखड मत मांडले होते.
[…]

बकवास नियोजनातील फोलपणा

गेल्या आठवड्यात पावसाने वऱ्हाडाचा तुरळक भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढले. मुंबई आणि कोकण या किनारपट्टीवरील प्रदेशात तर पावसाने विनाशकारी तांडवनृत्य केले. गेल्या 140 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने मुंबईचे तथाकथित सौंदर्य पार धुऊन काढले.
[…]

नवा विचार नवी दिशा!

एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल. […]

नियोजनांचा दुष्काळ

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाचा अनियंत्रित वर्षाव सुरू आहे. अनियंत्रित एवढ्याचसाठी की, कुठे मुसळधार पावसाने बंधारे फुटून पाणी गावात शिरल्याने लोकांचा बळी जात आहे, तर कुठे भर आषाढात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एरवी मोसमी पाऊस सार्वत्रिक असतो.
[…]

बुध्दिभेद की…?

जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. एकविसावे शतक विज्ञानयुगाचे, आधुनिक युगाचे ‘ब्रँडनेम’ ठरले आहे. वैज्ञानिक विकासाची शिखरे या युगात मानवी प्रयत्नांसमोर थिटी वाटू लागली आहेत.
[…]

तुझे आहे तुज पाशी….!

हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात कस्तुरीमृग म्हणून ओळखल्या जाणारी हरणाची जात आढळून येते. या हरणाच्या नाभीत सुगंधीत कस्तुरी असते. या कस्तुरीचा सुवास आसमंतात दरवळतो आणि या सुवासाने वेडे होऊन या जातीची हरणे सैरावैरा पळत असतात.
[…]

मायेचा पाश!

आपल्या देशाच्या लोकसंख्येने शंभर कोटीचा आकडा केव्हाच पार केला आहे. ही वाढती लोकसंख्या सरकारला संकट वाटत आहे. एका दृष्टीने पाहिले तर ते संकटच आहे.
[…]

सौ बका, एक लिखा!

जेजे लोकं इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांना भविष्य माफ करत नाही, असे म्हणतात. या म्हणण्यात तथ्य निश्चितच आहे. शेवटी इतिहास म्हणजे तरी काय?
[…]

नवा वर्णवाद!

अश्मयुगात रानोमाळ भटकणारा, शिकार करून कच्चे मांस खाऊन जगणारा माणूस शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यावर स्थिर झाला. आधी त्याचे हे संघटन टोळ्यांच्या स्वरूपात होते. पुढे या संघटनेला अधिक रेखीव स्वरूप प्राप्त झाले आणि समाजाची निर्मिती झाली.
[…]

अपभ्रंश आणि भ्रम!

एका शिक्षकाने विद्यार्थ्यांना परोपकाराची महती पटवून देताना इतरांना आपण कशा-कशाप्रकारे मदत करू शकतो, याची अनेक उदाहरणे सांगितली. बाळबोध विद्यार्थी ही महती ऐकून चांगलेच प्रभावित झाले. आपण परोपकार केलाच पाहिजे, असे त्या विद्यार्थ्यांच्या मनात ठसले.
[…]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..