नवीन लेखन...

कुठे मिळतो स्वाभिमान ?

प्रकाशन दिनांक :- 13/03/2005

इतरांना शहाणपण शिकविण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. आपल्याला कळते तेवढे दुसऱ्या कुणालाच कळत नाही, त्यामुळे या दुसऱ्यांना शहाणपणाच्या चार गोष्टी सांगायचा आपल्याला अधिकार प्राप्त झाला आहे, अशा भ्रमात बरेच लोक वावरत असतात. वस्तुस्थिती मात्र अशी असते की, इतरांना शहाणपण शिकविणारे हे लोकच मुळात अज्ञानी असतात.
[…]

नाक दाबावेच लागेल.

प्रकाशन दिनांक :- 06/03/2005
बिहार, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर सुरू असलेला लोकशाहीचा तमाशा बघता निवडणूक पद्धतीत आमूलाठा सुधारणा करणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. या दोन्ही राज्यात आणि याआधी केंद्रात तसेच इतर राज्यातदेखील खंडित जनादेशामुळे जी काही राजकीय साठमारी झाली अथवा होत आहे ती नक्कीच लोकशाहीचा गौरव वाढविणारी नाही. केवळ सत्तेसाठी आपल्या विचारधारा, श्रद्धा वेशीला टांगून राजकीय पक्षांमध्ये अक्षरश: अनैतिक सौदेबाजी होत असते.
[…]

शेतकरी आणि प्रतिष्ठित

आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कृषिक्षेत्राच्या, कृषकांच्या समस्या, त्यांच्या निराकरणाचे मार्ग या विषयावर चर्चेला पेव फुटले आहे. भारताचा शेतकरी प्रचंड हलाखीत जगतो आहे, शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत आहे, यावर झाडून साऱ्यांचे एकमत असते; परंतु शेतकरी दरिद्री का आहेत, यावर फारशा गांभीर्याने कोणी चिंतन करताना दिसत नाही. गॅट करारामुळे जागतिक व्यापार खुला झाला. […]

अनाकलनीय!

प्रकाशन दिनांक :- 06/02/2005

भौतिक सुखांची जिथे रेलचेल आहे त्या अमेरिकेतील अर्धी जनता आज झोपेच्या गोळ्या घेते. केवळ मन:शांतच्या शोधात ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांची संख्या अमेरिकेत प्रचंड आहे. 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर तर संपूर्ण अमेरिकन जनमानस एका अज्ञात दहशतीच्या छायेखाली जगत आहे.
[…]

जनता मंत्र्यांकडे, दुकानदार अधिकार्‍यांकडे!

प्रकाशन दिनांक :- 20/02/2005

र्ीकाम करून घेणे’ ही संकल्पना अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. एवढेच नव्हे तर काम करून घेण्याची कला आत्मसात करणे हीच यशाची एकमेव गुरुकिल्ली ठरू पाहात आहे. अर्थात केवळ वाच्यार्थाच्या दृष्टीने विचार केल्यास त्यात वावगे असे काहीच दिसत नाही, परंतु ‘काम करून घेणे’ या संकल्पनेमागील लक्षार्थ मात्र बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करून जातो.
[…]

आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!

प्रकाशन दिनांक :- 13/02/2005
‘आंबेडकरी’ हे विशेषण धारण करणारा जो साहित्य प्रकार मराठी भाषेत रुजू झाला त्याची आता अर्धशतकाकडे वाटचाल सुरु आहे. साधारण 60 च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेतविलेल्या स्फुल्लिंगाच्या ठिणग्या साहित्यरुपाने उडू लागल्या आणि अख्खं मराठी साहित्य विश्व या ठिणग्यांच्या दाहकतेने हादरुन गेले.
[…]

बेशिस्तीचे बळी!

प्रकाशन दिनांक :- 30/01/2005

महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीत मग्न असतानाच सातारा जिल्ह्यातील वाईजवळ असलेल्या मांढरदेव काळुबाई यात्रेत मात्र मृत्यूने आपले तांडव दाखवायला सुरुवात केली होती. अखेर अडीचशेपेक्षा अधिक बळी घेऊनच हे तांडव शांत झाले. चेंगराचेंगरीत इतक्या मोठ्या प्रमाणात जीवहानी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचे सावट पसरले.
[…]

केवळ खोट्या प्रतिष्ठसाठी

प्रकाशन दिनांक :- 23/01/2005

ऐहिक सुखासाठी पैसा लागतो, तो कमवायचा आणि तो कमवण्याच्या नादात मात्र सुख भोगायला वेळच शिल्लक ठेवायचा नाही, अशी बहुतेकांची परिस्थिती असते. अलीकडील काळात सुख आणि प्रतिष्ठा या दोन्ही संकल्पना इतक्या उथळ झाल्या आहेत की, चार पैसे फेकून त्या सहज प्राप्त होऊ शकतात असाच सगळ्यांचा समज झाला आहे.
जगण्याच्या गणितातला फोलपणा स्पष्ट करताना एका तत्त्ववेत्त्याने मांडलेले त्रैराशिक सर्वविदित आहे.
[…]

निष्क्रियतेचे उदात्तीकरण

प्रकाशन दिनांक :- 16/01/2005
पश्चिम महाराष्ट्राने विकास साधला म्हणण्यापेक्षा या भागाने विकासाची गंगा खेचून नेली, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भगिरथ प्रयत्नात त्या भागातील सामान्य शेतकरी तर सामील झालाच होता, सोबतच तिकडच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा वेळप्रसंगी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आपल्या मतदारांचे हित जोपासणे सर्वोतोपरी मानले.
विदर्भाचा अनुशेष,विदर्भ-मराठवाड्याचे मागासलेपण याबद्दल नेहमीच ओरड होत असते.
[…]

करंटेपणाची कमाल!

प्रकाशन दिनांक :- 09/01/2005

सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सुनामी लाटांनी दक्षिण आशियाई देशांना हादरविले. प्रचंड प्रमाणात प्राण आणि वित्तहानी झाली. सगळ्याच प्रसारमाध्यमात केवळ सुनामीच्या विध्वंसाचीच चर्चा होती.
[…]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..