MENU
नवीन लेखन...

गुरूजन हिताय, गुरूजन सुखाय!

धर्म या शब्दाला आता अनेक अर्थ प्राप्त झाले असले तरी पूर्वी धर्म म्हणजे नीतीने वागणे, धर्म म्हणजे आपल्याकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्यांची प्रामाणिक पूर्तता याच अर्थाने हा शब्द प्रचलित होता. क्षत्रिय धर्म, ब्राह्यण धर्म, वैश्य धर्म आदी शब्दप्रयोग जातीवाचक नव्हे तर गुणवाचक होते. समाजाचे संरक्षण करायचा तो क्षत्रिय आणि समाजाचे संरक्षण हा त्याचा क्षत्रिय धर्म, ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करणारा ब्राह्यण धर्माचे पालन करायचा, तर व्यापारउदीमातून अर्थार्जन करणारा वैश्य धर्माचे पालन करायचा.
[…]

निवडणुका नोकरशाहीच्या पथ्यावर!

सध्या संपूर्ण जगालाच मंदीची समस्या भेडसावत आहे. अमेरिकेसारखा धनाढ्य देशही या मंदीच्या तडाख्यातून सुटलेला नाही. इतर विकसित देशांचीही अवस्था फारशी चांगली नाही.
[…]

समन्वयाचा बोजवारा

ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घ्यायला साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे; परंतु त्यांनी जाताना आपल्या ज्या काही बऱ्या वाईट स्मृती इथे ठेवल्या त्यांचे ठसठशीत अस्तित्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवते. अशा अनेक स्मृतींपैकी एक म्हणजे त्यांनी या देशात रूढ केलेली प्रशासकीय व्यवस्था. ब्रिटन हा मुळातच भारताच्या तुलनेत एक चिमुकला देश, त्यामुळे खंडप्राय भारतावर हुकूमत गाजवायची असेल तर राज्यकर्त्यांना पूरक ठरणारी, मदत करणारी व्यवस्था इथल्या लोकांनाच हाताशी धरून उभी करणे त्यांना भाग होते.
[…]

साधी जखम झाली गँगरीन!

नक्षलवादी चळवळ काही वर्षांपूर्वी किंवा आता आतापर्यंत या देशातील उपेक्षितांची, वंचितांची चळवळ होती. त्यांनी अंगीकारलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य होता की नाही हा कायम वादाचा विषय राहत आला असला तरी हा संघर्ष देशांतर्गत होता. नक्षलवादी म्हणजे आपलीच माणसे होती आणि आपल्या हक्कांसाठी ती भांडत होती. […]

उदंड जाहली वाहने!

भारतात झपाट्याने विस्तार पावणाऱ्या उद्योग क्षेत्रांमध्ये मोटार उद्योग आणि दूरसंचार क्षेत्रातील उद्योगांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. अगदी पन्नास वर्षांपूर्वी जो समाज स्वत:ची सायकल बाळगणाऱ्याला श्रीमंत लेखित असे त्याच समाजात आता स्वत:ची कार असणे एक सामान्य बाब झाली आहे. चार चाकी गाडी हे आता श्रीमंतीचे लक्षण राहिलेले नाही.
[…]

असत्य सत्यम् !

युग संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. सगळ्याच गोष्टी कशा संगणकाच्या वेगाने होऊ लागल्या आहेत. तसे पाहिले तर वेगाचे हे अप्रूप मानवासाठी नवे नाही.
[…]

अमेरीकेची गुलामी कुठपर्यंत?

मुंबई हल्ल्याची भारतात तीप प्रतिक्रिया उमटल्यावर कदाचित जनतेच्या दबावाखाली येऊन भारत सरकार या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून पाकवर लष्करी कारवाई करण्याची साधी शंका येताच अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव कोंडोलिसा राईस तत्काळ भारतात दाखल झाल्या. त्यांनी भारताला काय प्रबोधन केले हे कळू शकले नसले तरी त्यानंतर भारताची पाकला कडक शब्दात इशारा देण्यापलीकडे मजल गेली नाही.

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचे कवित्व अद्यापही सुरूच आहे.
[…]

1 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..