किल्ले अंकाई टंकाई
अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो. […]
अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो. […]
काश्मीरसह भारताच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करून धुमाकूळ घालण्याचा कट ‘लष्कर ए तोयबा’ ने आखला आहे. शेकडो प्रशिक्षित सशस्त्र दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसणार असल्याची माहिती अबू जुंदाल याने दिल्ली पोलिसांना चौकशीत दिली आहे. मुंबईवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी असलेला अबू जुंदाल सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. लष्कर ए तोयबाच्या विशेष संपर्कात राहिलेल्या जुंदालच्या चौकशीतून अनेक गुपिते उघड होत आहेत. काश्मीरमधील शांतता दहशतवाद्यांना खुपत आहे.
[…]
“नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
[…]
सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? आत्मा या संकल्पनेवर अध्यात्माचा डोलारा उभा आहे. सजीवाचे शरीर जीर्ण झाले म्हणजे त्यातील आत्मा निघून तो दुसर्या नव्या शरीरात प्रवेश करतो. जुने शरीर मरते तर नवे शरीर जिवंत होते.
[…]
इ. स. २००९ साली निवडणुकांचे निकाल लागले नि मोहनकाकांची बस विकासाच्या वाटेवर टायमात सुटली. म्हणजे मंत्र्यांचा शपथविधी वेळेवर झाला. बसमध्ये केरळचा शशी मलुष्टे, लखनऊचा मुलायमशेठ, मायाताई, संगामामा, दिग्विनाना, एक साह्येब, (होम्योपथीचे नाही – पण अर्थशास्त्राचे) दोन डॉक्टर, दिल्लीचा युवराज, अशी तालेवार मंडळी होती.
[…]
भारताच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या चीनमध्ये श्री गणेश कसा गेला हे एक न सुटणारे कोडेच होय. चीन, तुर्कस्थान, नेपाळ किंवा तिबेट मधून हा प्रवास झाला असला तरी चीन मधील श्री गणेशाचे व येथील मूर्तीत विलक्षण फरक आढळतो.
[…]
पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मोसमी पावसाने दगा दिला, तर अगदी भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा अगदी थेंबाथेंबाने वापर व्हायला हवा. ऊस उत्पादक शेतकरी, त्यांचे नेते, साखर कारखानदार, कारखानदारीतून फोफावलेले राजकारणी या सगळ्यांना सरकारने जलशिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरच काही साध्य होऊ शकेल. तेवढी हिंमत आणि नैतिकता सरकार दाखवू शकते का, हाच खरा प्रश्न आहे.
[…]
कधी रिमझिम ,कधी मुसळधार,कधी वादळवा-यासह तर कधी उन्हाची सोबत घेऊन कोसळतो पाऊस.पावसाचे रंग तरी किती वेगवेगळे…मनसोक्त भिजणारी ,पावसाचे तुषार एकमेकांच्या अंगावर उडवत चालणारी लहान मुलं पाहिली कि गँलरीत उभ्या असणा-या आजोबांचा हातही नकळत पाऊस झेलण्यासाठी बाहेर येतो.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions