MENU
नवीन लेखन...

इतिहास पुसलेलं नांदेड

नंदीग्राम हे नाव नांदेडला असो अथवा नसो, हे भरताचं आजोळ असो किंवा नसो नि ते सात हजार वर्षाचं पुराणं असो वा नसो; पण ते किमान 2 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होतं याचे मात्र पुरावे आहेत. वर्‍हाडातील वत्सगुल्म (आजचं वाशीम) येथे सापडलेल्या चौथ्या शतकातील वाकाटक नृपती याने दिलेल्या ताम्रपत्रात गोदावरीच्या इतर तीरावरील नंदीतट हे गाव ब्राह्यणांना अग्रहार म्हणून […]

वराहकणींचे झाड, शेतकर्‍यांना मिळवून देईल घबाड !!!

विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो. […]

शेवगा एक औषधी तसेच फळभाजी वनस्पती !!!

दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते. […]

चमत्कारिक औषधी वनस्पती अगस्त !

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हजारो वनस्पतींची माहिती व त्यांचे उपयोग दिलेले आहेत, परंतु पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने भारावून गेलेल्या तथाकथित विद्वानांनी, ‘भारतीय ते त्याज्य आणि पाश्चात्य ते पूज्य अशी भ्रामक कल्पना रुजविल्याने भारतीय शास्त्र मागे पडत गेलीत.’

महागड्या एलोपेथिक उपचारांची वारंवार पुनरावृत्ती करूनही जे विकार बरे होत, नाही ते विकार आयुर्वेदातील सामान्य वनस्पतींच्या वापराने बरे होतात. फक्त यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैधकीय मार्गदर्शकाची गरज आहे. वनस्पतींमध्ये निसर्गाने चमत्कारिक क्षमता भरून ठेवलेली आहे, या क्षमतेचा पुरेपूर आणि डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे.

” वृषागस्तयो: पुष्पाणि तिक्तानि, कटूविपकानि क्षयाकासहरानि च |

अगस्तयं नातिशितोष्णम नक्तान्धानां प्रशस्यते || ” (सुश्रुत सूत्र. )

प्राचीन भारतीय ज्ञानाचा उपयोग जर, रोगोपचाराबरोबर राष्ट्रविकास आणि आर्थिक उन्नतीसाठी करता आला तर हा दुग्धशर्करा योगच ठरेल. […]

दुर्मीळ खजिना गवसला

लोकराज्यचे 1956 पासूनचे अंक मी ग्रंथालयात अनेकवेळा चाळले होते. मात्र त्यापेक्षाही जुने प्रारंभीचे अंक मिळणार म्हणून मी जरा जास्तच आनंदात होतो. मनात विचारांची गर्दी जमली होती. लोकराज्यची मोठी परंपरा नजरेसमोर येत होती. लोकराज्य हे केवळ नियतकालिक नाही तर तो आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार आहे. गेल्या सहा दशकात लोकराज्यने खूप काही अनुभवले आहे.
[…]

भ्रष्टाचाराचा डेटाबेस

भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे. आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत. […]

फळांपासून विविध पेये – २

फळांपासून विविध प्रकारची पेये तयार करण्यासाठी प्रथम त्यांचा रस काढून घ्यावा लागतो. रस काढण्याची पद्धत ही प्रत्येक फळासाठी वेगवेगळी असते. रसाचे प्रमाण  जास्त मिळवण्यासाठी काही रसायनांचा उदा. जिलेटिन, केसिन तसेच काही विकरांचा उदा. पेक्टिनॉल, ट्रायझाईम-५० तसेच पेक्टिनेक्स -३ एएक्सएल इत्यादींचा वापर केला जातो.
[…]

कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली. […]

फळापासून विविध पेये – १

फळांपासून तयार केल्या जाणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये पेयांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा पेयांचे आहारमूल्यसुध्दा चांगले असते. फळांच्या रसापासून सरबते, स्क्वॅश, सिरप, कॉर्डियल, भुकटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात.
[…]

जीवनदायी सलाइनची बाटली

वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे. टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या पिकवणं हा त्यांचा व्यवसाय. शेतात दोन विहीरी. दोन्ही विहिरींतील पाणी भाजीच्या मळ्याला पुरवणं हा नेहमीचा कार्यक्रम.
[…]

1 2 3 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..