नवीन लेखन...

नाट्यपंढरीचा वारकरी

महाराष्ट्र विद्यालयातील आठवीचा वर्ग. मराठीच्या शं. रा. देवळे सरांचा तास होता. आदल्या दिवशीच सरांनी सर्व विद्यार्थ्यांना निबंध लिहून आणायला सांगितला होता. विषय दिला होता, ‘तुमचा आवडता लेखक.’ सर वर्गात येऊन बसले. वर्गावर एक नजर फिरवली व म्हणाले, ‘प्रत्येकाने पुढे येऊन आपला निबंध वर्गाला वाचून दाखवा’. एकेकजण पुढे येऊन वेगवेगळ्या लेखकांवर लिहिलेले निबंध वाचून जात होता. एकाचाही […]

बुद्धिबळ

बुद्धीबळ (chess) खेळणारा व्यक्ति आपल्या बुद्धीचा वापर करून, त्या खेळाचे नियम समजून त्या खेळामध्ये पारंगत होतो. त्याचप्रमाणे आपण ही ज्ञानाच्या आधाराने जीवनाचे नियम समजून, बुद्धीचा वापर करून प्रत्येक कार्य करावे. तेव्हाच आयुष्यामध्ये संतुष्टतेचे धन कमवू शकतो. स्थूल धनासोबत संतुष्टतेचे धन ही आपण बुद्धीबळाद्वारे प्राप्त करू शकतो. सुखी-समाधानी होऊ शकतो. […]

मोहरणाऱ्या मनात मी

मोहरणाऱ्या मनात मी लाजून अलवार आहे सांडले अत्तर गंधित मी मोहक दरवळून आहे.. लाजला मोगरा अलगद अंतरी गंध मिटून आहे चांदण्याचा गजरा माळीला मी चंद्र हसून मज पाहत आहे.. स्वप्नांतल्या कळ्यांची कविता मी आल्हाद गुंफून आहे सागराची गुज हलकेच मी स्वातीचे मोती हृदयस्थ अबोल आहे.. — स्वाती ठोंबरे.

इमानदारी…

इमानदारीत काम करणाऱ्या कामगाराला त्याच्या मालकाने त्याच्या कामाचा इमानदारीतच मोबदला द्यायला हवा ! पण तसे न होता या इमानदार लोकांचीच आज समजात दुर्दैवाने जास्त पिळवणूक होताना दिसते. मग नकळत मनात विचार येतो…इमानदारीचा ठेका काय फक्त गरिबांनीच घेतलेला आहे का ?… […]

सल

तुझ्या अंगणात जाईजुईचे गं सडे मन दुखे का गं सखे का गं झाले पाहून वेडे कळ उठे अंतरीही दावू कशी उघडून तुझ्या अंगणाचा हेवा कशी सांगू उलगडून सारे वाटे मज हवे, पर कसे ते मिळावे काटेरी च्या बना आम्ही सदोदित जगावे सुंगधाही पारखी मी, वाटेत काटेच काटे वेल लावू कुठे गं हा, ज्यात परिमळ दाटे वाटे, […]

‘अर्धसत्य’ चित्रपट

पोलिस, राजकारणी आणि माफियांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिका-याची कशी ससेहोलपट होते याचे वास्तव दर्शन घडवणा-या ‘अर्धसत्य’ या चित्रपटाने १९८३ मध्ये चांगलीच खळबळ माजवली होती. […]

विसरायचं म्हणलं तरी

विसरायचं म्हणलं तरी मन अधिक भरकटत किती आवरा मनाला नको तिथं गुंतून जातं… ओल्या आठवणी साऱ्या कातरवेळी मनात तरळतात डोळ्यांतील अलगद थेंब मग पापणी आड जमा होतात… आठवणींचं गाठोडं कस अलगद हलकं करायचं ? रित्या मनाला खोलवर कस सावरुन घ्यायचं… नको होतात मग रात्री तुझी आठवण ती येता हळवे होते मन त्या वेळी रात्र सुनी अबोल […]

काळजाचं दुकनं

माज्या कुकवाचा धनी, माज्या डोरल्याचा मनी कवातरि ऐक माज्या काळजातली गानी भिताडानाबी कळतंय रोजचं माज दुकनं तूला का कळू न्हाय, माज झिजून झिजून ह्ये जिणं संगटीने ऱ्हातुयस येकाच खोपीमंदी संगटीने पितुयस येकाच खापरातलं पानी तरी बी ऱ्हातुया कोरडंच वाळवंटावानी दावू कसं रं तूला, माज्या पिरितीतली ज्वानी खोपट्यातल्या गर्दीत हुडकू सांग कसं माज्या काळजातलं इप्सित सांगू तुला […]

भूशास्त्रज्ञ शंकर पुरुषोत्तम आघारकर

सवड मिळताच निरनिराळ्या ठिकाणी जाऊन ते वनस्पती आणि प्राण्यांचे निरीक्षण करत. आवश्यकता वाटल्यास त्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत घेऊन येत. त्यांच्या या छंदामुळे पश्चिम घाटातील नद्या आणि पाणवठे यात लिम्नॉक्निडा इण्डिका या जलव्याल प्राणीसंघातील जलपुष्प गणातील प्राण्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले. त्यापूर्वी पश्चिघम घाटात या जलपुष्पाचे अस्तित्व कोणासही ठाऊक नव्हते. तांबी, वेण्णा, धोम येथील धरणांमध्येही हे प्राणी आढळून आले. त्यावर ‘नेचर’ या प्रख्यात नियतकालिकात त्यांचा संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाला. […]

1 59 60 61 62 63 293
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..