नवीन लेखन...

प्रत्येक “जाणं” सारखंच असतं !

काल रात्रीच भूपेंद्र सिंग यांच्या जाण्याची बातमी वाचली. इतकं आगंतुक आणि न सांगता -सवरता जाणं वाटलं की खूप वेळ मी अस्वस्थ होतो. नुक्तीच त्यांच्या आणि सुवर्णा माटेगावकरांच्या “बिती ना बिताई ” वर मी पोस्ट लिहिली होती. […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 1

पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले. पांडुकेश्वर […]

मार्क ट्वेनची चरित्र कथा

त्याचे लिखाण संशोधित करून, एकत्र ठेवण्याचा व त्याची सूची ठेवण्यासाठी एक संस्था अजूनही कार्यरत आहे. त्याने अनेकानेक वृत्तपत्रांतून अनेक वर्षे लिहिल्यामुळे तो संशोधनाचा विषय झाला आहे व नेहमी नवीन कांही तरी सापडतच असते. त्याची सामाजिक विषयांवरची मते अत्यंत प्रागतिक होती. काळ्या लोकांना जी वागणूक देण्यात यायची त्यावर तर तो टिका करतच असे पण एकंदरीतच स्त्रीयांसह सर्वांना व्यक्तीस्वातंत्र्य त्याला अभिप्रेत होते. साम्राज्यशाही, भांडवलदारांनी चालवलेली कामगारांची पिळवणूक ह्यांवर तो प्रखर टिका करत असे. अनेकवेळा चर्चच्या त्या काळांतील प्रभावामुळे व त्याच्या अशा मतांमुळे त्याच्या पुस्तकांवर सेन्सॉरकडून बंदी घालण्यांत आली. त्याला कॉपीराईटसाठीही अनेकदा झगडावे लागले. त्याला पूर्ण लोकमान्यता व राजमान्यता नंतरच मिळाली परंतु त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकूण साहित्यावरच कायम आपला ठसा राहिलं असे विपुल लेखन केले यांत शंका नाही. त्यामुळे साहित्यात मार्क ट्वेनचे नांव अजरामर झाले आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – २९ – दुर्गावती वोहरा (दुर्गा भाभी)

नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे. […]

शिवकाल भूषण

भोसलेकुलोत्पन्न प्रथम पूजनीय प्रातःस्मरणीय युगपुरुष, शककर्त्या छत्रपति शिवाजी महाराजांचे सार्थ, यथार्थ वर्णन समकालीन व्यक्तींपासून ज्यांनी ज्यांनी केलेले आहे त्यात आधुनिक युगात बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव त्या मांदियाळीत अवश्यमेव घ्यावेच लागेल. बाबासाहेब नेहमीच सांगत आलेत, ‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात.’ काय खोटं आहे यात? शिवछत्रपतींना जर स्वातंत्र्याचा, स्वराज्य स्थापनेचा उत्कट, […]

सत्तेची खुर्ची

(सत्तेची खुर्ची एक वेगळी मजबूत होती. चार पायांवर भक्कम उभी होती. आताची खुर्ची – ?) एक खुर्ची चार पाई भक्कम मजबूत एके ठाई एक खुर्ची तीन पाय एक गळाला कळलं नाय एक खुर्ची दोन पाय दोन गळाले, खुर्ची तर हाय एक खुर्ची एक पाय काय बिगडलं फिरती हाय कुटं बी वळीवलं तर काय बी बिगडत नाय […]

सत्य प्रीती

मनाची समजूत कशी घालावी नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची सांगना मी तुला गं विसरु कसे हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची प्रीतीविना कां? असते जीवन लाभते प्रीती, संचिती सुखाची कोवळ्या कळीत मकरंद मधुर भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे त्याविण नसे, प्रचिती सुखाची भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे कृपा सार्थकी, त्या भगवंताची — […]

उजेडाची पहाट येवो !

अगदी वेदमंत्रासारखी ऋचा वाटतेय ना? अर्थात शब्दांना अद्याप मंत्रांचे सामर्थ्य प्राप्त झालेले नाही,याची जाणीव आहे. पण गेल्या १०-१२ दिवसांच्या कुंद सकाळच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी उजेड दिसला (रविवार सकाळ म्हणून की काय?) […]

जिंगल्स आणि बरेच काही

गाणे हा एक योग असतो, हे विलासचे म्हणणे मला पटले. कारण अजून दोन उत्तम योग यापुढील काळात आले. मुंबई विभागाच्या संस्कृत विभागासाठी पं. वेलणकर यांनी लिहिलेले आणि संगीतकार प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेले माझ्या आयुष्यातील पहिले संस्कृत गीत गायलो. रेकॉर्डिंगच्या वेळी पं. वेलणकर यांना भेटलो. पत्रावर पत्ता लिहिताना आपण जो पिनकोड नंबर लिहितो, त्याचे जनक पं. […]

कावळे (कथा) – भाग 3

ठरल्याप्रमाणे मी खाँसाहेबांच्या टीम बरोबर गोव्याला गेलो. त्या समारंभासाठी खाँसाहेबांनी माझ्यासाठी अन्वरसारखाच सुंदर जोधपुरी ड्रेस घेतला होता. विमानतळावर उतरल्यापासून आमचा ताबा ‘पंचरंग’च्या गोवा शाखेने घेतला होता. आणि इथेच, माझा वासंतीशी परिचय झाला. पाहता क्षणीच माझ्या मनीची राजकुमारी, हीच असे मला वाटले. अत्यंत तरतरीत, बोलके डोळे, गोरीपान, हसतमुख असे तिचे व्यक्तिमत्त्व पाहता क्षणीच प्रेमात पडावे असे होते. […]

1 10 11 12 13 14 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..