नवीन लेखन...

स्मार्ट फोनच बनला रिमोट

टीव्ही पाहताना रिमोटचा वापर अपरिहार्य बनला आहे. पण हल्ली टीव्ही केवळ वाहिन्या पाहण्यासाठीच नव्हे तर इंटरनेट, नेटवर्किंग साईट्स आणि इतरही अनेक अॅप्लीकेशन्साठी वापरला जातो. अशा वेळी ग्राहकाला रिमोटद्वारे टायपींगचीही गरज पडते. म्हणून स्मार्ट फोनचाच रिमोट म्हणून वापर करता यावा यासाठी काही अॅप्लीकेशन्स तयार करण्यात आली आहेत. टीव्ही कंपन्याही अशी अॅप्लीकेशन्स तयार करू लागल्या आहेत.
[…]

विचाराचे महत्त्व

शब्द दुय्यम आहेत विचार महत्वाचा त्यामुळे आपण काय विचार करतो या कडे बारकाईने लक्ष द्या – स्वामी विवेकानंद

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला विचार करायला फुरसतच कुठे आहे? आणि विचार करत बसला तर आलेली संधी हुकण्याची शक्यता अधिक पण त्यामुळे अविचाराने केलेल्या गोष्टींचा त्याला कधी कधी मनस्ताप हि फार होतो किंबहुना एखादीच गोष्ट यशस्वी झालेली आढळते.

त्यामुळे विचारपूर्वक केलेली कृती हि निश्चितच फलदायी ठरते. आणि यदाकदाचित ती यशस्वी झाली नाही तरी त्याचे होणारे परिणाम भोगण्यास आपण निश्चितच तयार असतो

विचार महत्वाचा कारण त्याच्या अनुषंगानेच पुढील कृती होत असते. म्हणून चांगल्या कृतीमागे चांगले विचार असतात.

प्रत्येकाने आपण काय विचार करतो याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे मग त्यामध्ये आपण आपल्या संबधी किती विचार करतो, समाजासाठी मी म्हणत नाही कारण ती मक्तेदारी फक्त राजकार्ण्यानीच घेतलेली आहे पण शेजाऱ्या संबंधी किती विचार करतो, आपल्या संपर्कात येणारी माणसे त्यांच्या बद्दल किती विचार करतो, निसर्गात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा किती विचार करतो आणि तो विचार जीवनमान सुधारण्यास, किंवा एखाद्याला जगण्याची उमेद देण्यास, वार्धक्याकडे झुकलेल्या व्यक्तीचा उत्साह वाढविण्यास तो कारणीभूत होतो कि नाही हे महत्वाचे.

एखाद्या रोपट्याची जोमाने वाढ होण्यासाठी जशी त्याला खात, पाण्याची गरज असते त्याच प्रमाणे चांगले विचार येण्यासाठी सुद्धा गरज असते ती चांगल्या वाचनाची, शुद्ध चारित्र्याची, निरोगी आरोग्याची, आणि मुख्य म्हणजे सुसंगतीची गरज असते नि या गोष्टी तुम्ही प्राप्त करून घेतल्यात कि चांगले विचार

आपोआप एकामागे एक येऊ लागतील जशी रेशीम लडी उलगडत जावी किंवा चित्रपटाची दृशे एकापुढे एक येऊन कथा पुढे सरकावी मग तुमचे चांगले विचार सर्व दूर पसरण्यास वेळ लागणार नाही आणि चांगल्या विचारांची कमीही पडणार नाही.

चांगले विचार जगण्याची नवी उमेद देतातच पण कठीण प्रसंगी धीरही देऊन जातात व भीतीचे उच्चाटन करतात आणि वाईट विचार येण्याचा मार्गाच बंद करून टाकतात. म्हणूनच संतमंडळी सांगतात ” सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ” म्हणजे जेणे करून सुविचार प्रसवतील व समाज सुधारण्यास मदत होईल हे निश्चित.
[…]

मोबाईल ग्राहकात फसवणूकीची भावना

मोबाईल कंपन्यांनी सुमारे पाच वर्षापूर्वी ९९५ रुपयांत लाईफटाईम योजना जाहीर केली तेव्हा दरमहा रिचार्ज करायला कंटाळलेल्या अथवा दरमहा तितका वापर नसल्याने जबरदस्तीने रिचार्ज करून आपला बॅलन्स अधिकच फुगवायला नाऊत्सुक असलेल्या असंख्य ग्राहकांनी त्यावेळी अक्षरशः हजार हजार रुपयांनी आपले खिसे खाली केले आणि या मोबाईल कंपन्यांच्या तिजोऱ्या भरल्या.
[…]

चार सीमचा मोबाईल फोन 4 SIM Mobile

आत्तापर्यंत तुम्ही एक, दोन व जास्तीतजास्त तीन सिमकार्डचे मोबाईल फोन पहिले असतील.पण आता ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल असा चार सीमचा एक मोबाईल फोन आता मार्केटमध्ये आला आहे. GFive या चायनाच्या कंपनीने GF 90 4 SIM नावाने हा मोबाईल मार्केटमध्ये उतरवला आहे. हा केवळ चार सिमचा मोबाईल नसून त्यात उत्तम मल्टीमिडीया फिचर्सही समाविष्ट केलेली आहेत.
[…]

वाहिन्यांना हवी आचारसंहिता

‘बिग बॉस’ मधील उत्तान, अश्लील चाळे आणि ‘राखी का इन्साफ’ मधील असभ्य, मानहानीकारक वक्तव्ये यामुळे या दोन्ही कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी पुढे आली. त्या निमित्ताने वाहिन्यांवर अंकुश ठेवण्याचाही मुद्दा ऐरणीवर आला. खरे तर वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या प्रसारणावर कायद्याने अंकुश ठेवायला हवा किंवा त्या संदर्भात आचारसंहिता तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी.
[…]

1 188 189 190 191 192 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..