नवीन लेखन...

भाव अंतरी उमलत होते…

दत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा

‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती

परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘

त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव

ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.
[…]

नातं- स्त्रीचं स्त्रीशी

कॉलेजात प्रवेश केल्यावर जाणवणार्‍या अनामिक हुरहुरीसारखी एक अनामिक हुरहूर कॉलेज संपत येऊ लागल्यावरदेखील जाणवू लागते. ‘पुढे काय?‘ याविषयी काहींनी ठरवलेले असते, तर काहींचे काही निश्चित मनाजोगते ठरतच नसते. अशा भांबावलेल्या मनःस्थितीत आपण व आपली खास मैत्रिण एकमेकींना यापूर्वी जशी साथ दिली तशीच यापुढेही प्रत्येक क्षणाला देऊ, असे मनोमन ठरवित असतो. अन् एक दिवस खरोखरच कॉलेज संपते… अन् सुरू होते कॉलेज कॅम्पसपेक्षा मोठ्ठ्या कॅम्पसमधली अस्तित्त्वाची लढाई!
[…]

श्रेष्ठ कोण? मुलगा की मुलगी?

शिक्षण तसेच करिअरमधील यशाच्या बाबतीत हल्ली मुलीच मुलांपेक्षा जास्त आघाडीवर दिसतात. याची कारणं काय, हे जाणून घेण्यासाठी दूरदर्शनवर झालेल्या एका महाचर्चेतील चर्चित मुद्द्यांचा परामर्ष घेणारा आणि यासंदर्भात आणखी काही वेगळे मुद्दे मांडणारा लेख-
[…]

यम् मोठम् खोटम्

अशा या विवाहांमध्ये आणखी एक विशेष आढळतो, तो म्हणजे यातील बरेचसे विवाह हे आंतरजातीय किवा आंतरप्रांतीय प्रेमविवाह आहेत. म्हणजे समाजपरिवर्तनाकडे जाणारे हे अजून एक पाऊलच म्हणावे लागेल.
[…]

पत्र अजन्मा मुलीचे

तू मला आताच असे उडवून लावू नकोस… कदाचित या जगात मी महान कार्य करून दाखवेन. मी तुझ्या प्रेमाचे बीज आहे. मला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे! या फुलाला फुलू दे, आई! हे बघ- मी नाजूक, कोवळ्या हातांनी तुला विनवणी करते. मला समजून घे. मला वाचव, आई! आता पपा येतीलच तुला क्लिनिकमध्ये घेऊन जाण्यासाठी! तू त्यांना नकार दे! माझी शप्पथ आहे तुला! त्यांना तू समजावून सांग! माझी हत्या करण्यासाठी कोठेही जाऊ नकोस! त्यांनी तुला क्लिनिकला नेलेच बळजबरीने, तरीसुद्धा तू परत घरी निघून ये, आई! मी इवलासा श्वास घेऊन जगत आहे. माझे जीवन तू हिसकावून घेऊ नकोस! मला निर्दयपणे मारू नकोस आई! आई, हे तू कधीच करू नकोस! […]

ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!

अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भांजी टका शेर ख्वाजा. हजारो साल पुरानी कहावत आपल्या महाराष्ट्र सरकारला लागू होते. महाराष्ट्रा फक्त मुंबई,पुणे येथेच आहे या दृष्टीकोनातून सर्व निर्णय राबवले जात आहे मुलांचा सत्यानाश व्हायचा तो टाळत नाही. १२विचा निकाल जाहीर करण्याची लगीन घाई करते वेळी खेड्या-पाड्याचा विचार ग्रामीण भागातून निवडून आलेला राजकारणी सुद्धा करत नाही हे या देशाचे दुर्देव्य आहे, हा नेता मुंबईच्या चमकोगीरीला भुलून स्वत;च्या मतदाराला विसरून जातो. आणि महमद तुघलक हा राजा बरा असे वाटते.
[…]

खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का?

स्वातंत्र्यापूर्वी जेवढा तीव्र स्वाभिमान आपल्यात होता, त्याच्या शतांशानंही तो आज उरला नाही, हे कारण आहे का? इंग्रजी बोलण्यात, घरांची नावं इंग्रजी ठेवण्यात, हवामान प्रतिकूल असूनही इंग्रजांसारखी वेषभूषा करण्यात, निमंत्रणं इंग्रजीतून काढण्यात, अंतर्गत पत्रव्यवहार इंग्रजीतून करण्यात, समिति-वृत्तांत इंग्रजीत देण्यात, नाना प्रकारांनी दास्यवृत्ती टिकवण्याचा, वाढवण्याचा, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा, संक्रामित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचं पाहणं, आमच्यासारख्या वृद्धांना खंतावून जातं.
[…]

1 220 221 222 223 224 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..