नवीन लेखन...

मराठी भाषाभिमान्यांसाठी मार्गदर्शक ग्रंथ : भाषाशुद्धीचे व्रत!

कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्‍या किंवा ते बोलणे ऐकणार्‍या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्‍या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
[…]

पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .

या मुळे काळे गोरे असा भेद कारणे चूक आहे. राजकीय , सामाजिक, आर्थिक भ्रष्ट्र समाज व्यवस्था टिकून राहावी या करता आपण लोकांनीच या हिमालया एवढ्या मोठ्या मानवांना जात-पात , मराठा, ब्राम्हण,माळी,कोळी बहुजन उच्च-नीच वर्ण काँग्रेसी, संघीय , डावे, उजवे परत प्रांतीय धार्मिक अश्या कप्प्यात बंद केले आहे. पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
[…]

धर्मांतर

प्रत्येक धर्म आणि धर्माची शिकवण पवित्र असते. धर्म हा व्यक्तिगत असतो. त्यामागे त्या व्यक्तीची श्रद्धा आणि विश्वास असतो. समधर्मीय व्यक्तींना एकत्रित आणण्याचा तो एक धागा असतो. धर्म मानणे, धर्माचे संस्कार मानणे, ती शिकवण व्यवहारात पाळणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही एक खोलवर जपलेली श्रद्धा आहे.
[…]

यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।

आम्ही वेगळे झाल्यावर उपाशी राहू अथवा मरुत याच्याशी तुम्हाला काय देणे घेणे . नाही तरी तुमच्या राज्यात राहून आम्हाला आत्महत्या कराव्याच लागतात ना? मग वेगळे होवून परिस्थिती शी टक्कर देत आम्ही जगण्यास शिकुत, तुम्ही फेकलेल्या अनुदानाच्या तुकड्यान ची वाट पहावी लागणार नाही. एक मात्र खरे या परिस्थितीत आम्ही आत्महत्या मात्र करणार नाही.

105 बलिदाने आपणास 50 वर्षा नंतर ही भावनिक black making करता आठवतात पण 10000 शेतकऱ्यांच्या तुमच्या राजकारण्यांनी केलेल्या हत्त्या दिसत नाही
[…]

बलसागर भारत होवो

‘भारताला स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे मिळाले, गांधीजींमुळे नव्हे,‘ असे उथळ विधान जनसंघटनेच्या एका नेत्याकडून अपेक्षित नव्हते. सुदर्शनजी पुढे असेही म्हणतात की, ‘इंग्रज देश सोडून गेले, कारण त्यांचा सैन्यदलावरील विश्वास उडाला होता. आणि एवढा मोठा देश आपल्या ताब्यात ठेवणे त्यांना अशक्य वाटले.‘ शेवटचे विधान मात्र सत्य आहे. परंतु भारतीय स्वातंत्र्य याच्यामुळे वा त्याच्यामुळे मिळाले, असे त्याचे सरळसोट उत्तर नाही व तसे ते नसणार, हे सांगावे लागेल असे कधी वाटले नव्हते. परंतु सुदर्शनजींनीच असे म्हटल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी लक्षात आणून देणे भाग आहे.
[…]

चला विठ्ठला आता तू सुद्धा तिरुपती,original शिर्डीवाले साईबाबा …..

आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे शोधिशी रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.
[…]

वणवा खरचंच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

यावर प्रतिक्रिया अवश्य द्या आणि त्याच बरोबर पर्यायी शब्द भांडार कसे वाढेल या करता ठोस यंत्रणा उभी करावी लागेल.तरच मराठीला भविष्य आहे.

धर्म ही अफूची गोळी आहे हे सत्य मानलं तर मालिका या अधिक प्रभावी अफूच्या गोळ्या म्हणाव्या लागतील.
[…]

“लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी!” – भारतात निर्माण झालेलं सर्वात भव्य गीत.

सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. […]

आत्मभान जागवणार्‍या यशोगाथा – अदान अॅण्ड ईव्हा, कटिग फ्री आणि इराणमधून सुटका

‘अदान अॅण्ड ईव्हा’, ‘कटिग फ्री’ आणि ‘इराणमधून सुटका’ हे तीन दर्जेदार अनुवाद प्रकाशित केले आहेत. उज्ज्वला गोखले, सुप्रिया वकिल, विदुला टोकेकर यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतातच; पण एका विदारक वास्तवाचे दर्शन घडवतात. तिनही आत्मकथने महिलांच्या जीवनलढ्याच्या कहाण्या आहेत. हा लढा त्यांनी धिरोदात्तपणे देऊन स्त्री शक्तीची ओळख करून दिली आहे.
[…]

1 223 224 225 226 227 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..