नवीन लेखन...

व्यासंगाने घडविलेली प्रगल्भ काव्ययात्रा

डॉ. स. रा. गाडगीळ हे एक व्यासंगवेडे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे अवघे आयुष्य शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करण्यात व्यतीत झाले. निर्वाहाची सक्ती म्हणून नव्हे; पण व्यासंग ही गाडगीळांची वृत्तीच आहे. अध्यापन विषय झालेले पुस्तक, ते लिहिणारा लेखक, तो वाङ्मयप्रकार यांचा सर्वांगीण अभ्यास करून त्या कोंदणात ते विशिष्ट पुस्तक बसवण्याची त्यांची सवय होती. आता `मराठी काव्याचे मानदंड’ अधोरेखित करणारे नवे विवेचन घेऊन मराठी अभ्यासकांसमोर ते आले आहेत.
[…]

संतसाहित्य समीक्षेतील धाडस

प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी `संत एकनाथांचे अभंग, स्वरूप समीक्षा हा ग्रंथ लिहून मराठी संतसाहित्याच्या समीक्षेतील एक रिकामी जागा भरून काढण्याचे श्रेय अभ्यासाने प्राप्त केले आहे. रिकामी जागा भरली असे म्हणण्याचे कारण असे आहे, की अनेक अभ्यासकांनी नाथांच्या विविध साहित्यांवर साक्षेपी लिखाण केले आहे.
[…]

रणथंबोरच्या रानात – प्रवासवर्णन नव्हे

दीपक दलाल हे नाव इंग्रजी भाषेतील साहसकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी लक्षद्वीप, अंदमान, लडाख यासंबंधी साहसकथा लिहिल्या आहेत. राजस्थानातील रणथंबोर अभयारण्यासंबंधीच्या त्यांच्या साहसकथेचा अनुवाद श्री. पु. गोखले यांनी केला आहे. नावावरून हे प्रवासवर्णन वाटत असले, तरी प्रत्यक्षात ती साहसकथा आहे. गोखले यांनी इतक्या सहजतेने अनुवाद केला आहे, की हा अनुवाद आहे, हे सांगावे लागते.
[…]

केशर-सेंद्रियातून संजीवनी – (पुस्तक परिक्षण)

प्रयोगशील माणसे ही नेहमीच नव्याचा ध्यास घेत कार्यरत असतात. सुरेश वाघधरे हे नावसुद्धा शेतीत प्रयोग करणाऱयांमधील एक प्रमुख आहे. म्हणूनच त्यांच्या प्रयोगाची माहिती देणाऱया `केशर : सेंद्रियातून संजीवनी\’ या पुस्तकाची तिसरी सुधारित आवृत्ती प्रसिद्ध झाली. या नव्या आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे प्रयोग केले प्रामुख्याने वीजनिर्मिती, शेण, गोमूत्र, स्लरी, खतनिर्मिती, सिंचनाची किफायतशीर पद्धत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या २३ वर्षांपासून जे आपल्याला समजले ते दुसऱयाला सांगावे यानुसार शेतकऱयांसाठी माहिती त्यांनी अत्यंत खुलेपणाने उपलब्ध करून दिली आहे.
[…]

विक्षिप्तांचे प्रकार

सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्यप्राणी समजावून घेणे अतिशय अवघड आहे. जे केवळ वर्तमानाच जगतात अशा चतुष्पाद प्राण्याचे व पक्ष्यांचे जीवन मर्यादित क्षेत्रात, विशिष्ट पद्धतीने नेमून दिल्यासारखे असते. त्यांची चाकोरी ठरलेली असते; परंतु तिन्ही काळात जगणाऱया माणसाला बुद्धीचे वरदान लाभले आहे. पंचज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने, स्वयंप्रेरणेने, प्रतिभेने तो प्रगती साधत असतो. त्याला मर्यादा नाही. त्यामुळे माणसांच्या तऱहा अनेक, एकासारखा दुसरा नाही.
[…]

निवडणूका आटोपल्या – सरकार आलं – पुढं काय?

येणार्‍या 1 मे ला महाराष्ट्र राज्य आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीन त्यावेळी आपण अनेक गोष्टींचा विचार करायला हवा त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याचे राजकारण. खरेच महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे का याचा उहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे. […]

टिप्स नेटभेटीच्या

सध्या इंटरनेटवर ऑनलाईन मॅरेज-ब्युरोजचे मोठे प्रस्थ आहे खरंतर याचा उपयोगही फार होतो. शादी डॉट कॉम, जीवनसाथी. भारतमेट्रीमोनी वगैरेसाख्या साईटसना अक्षरशः हजारोंच्या संख्येने रिस्पॉन्स मिळतो. या साईटसवर वावरताना आणि एकूणच त्यात माहिती भरताना काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. […]

स्वाइन फ्लू…हे लक्षात ठेवा

स्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी… स्वाइन फ्लू म्हणजे काय? स्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी […]

निवडणूक मार्गदर्शक तत्त्वे – काय करावे, काय करु नये

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत काय करावे आणि काय करु नये याबद्दल माहिती. […]

1 226 227 228 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..