नवीन लेखन...

एक जागा अद्भुत बागा!

“वाळवंटात फुललेली बाग तुम्ही पाहिलीत का हो?” गाडी चालवता चालवता अचानक यशोधनने विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हेच समजेना. “तू वेडा आहेस की काय? वाळवंटात बाग, तीही फुललेली? छे, काहीतरीच प्रश्न!” अशीच काहीशी प्रतिक्रिया माझी होती! कारण वाळवंट म्हटले की डोळ्यासमोर येतो तो वाळूचा अथांग समुद्र, त्यावर उठणारी वाळूची वादळे, त्यामुळे तयार होणाऱ्या वाळूच्याच लाटा… क्वचित […]

प्रतीक

भोवतालच्या जगाकडे मी जेव्हा डोळसपणे पहातो मनाचा आरसा माझा मी अलगद उघडतो वाटतो मला आंधळा जगाच्या अधोगतीकडे पाहून घेत असेल डोळे मिटून वाटतो मला एकांध घेत असेल संधी एक डोळा मारुन दाखवत नसेल ना लंगडा जीवनातला अधूरेपणा पृथ्वीवर असता एक डोळा दूजा चंद्रावर रोखून वेध नसेल ना घेत अनंताचा एखादा चकणा पुढे आलेले दात दिसतात गाताना […]

पिरॅमिडसच्या देशात

१०-१२ वर्षापूर्वी इजिप्त आजच्या पेक्षा खूपच शांत व सुरक्षित होतं. सरकारने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यावर, हॉटेलमध्ये, चौकाचौकात पोलीस तैनात होते. ते दिवस रमादानचे होते. त्यामुळे सिंगापूरहून निघतानाच टूर एजन्सीकडे आम्ही खूप चौकशा केल्या होत्या. […]

पहिले बालनाट्य संमेलन

ठाण्याच्या नाट्य परंपरेला साजेशा, ठाणेकरांना अभिमान वाटाव्या अशा काही घटना, आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या आहेत. पण म्हणून त्यांचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. सोलापूर येथे नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेले बालनाट्य संमेलन पहिले बालनाट्य संमेलन मानले जाते. पण २५ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने ठाण्यात भरलेलं बालनाट्य संमेलन हे कालक्रमानुसार पहिले ठरते. ठाण्यामध्ये बालरंगभूमी […]

क्षेत्र गाणगापूर तथा गंधर्वपूर

दत्त संप्रदायाची काशि म्हणुन गाणगापूर या तीर्थाचे महत्व सांगितले आहे. श्री नृसिहंसरस्वतीनी आपल्या ८० वर्षाचे कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. औदुंबर क्षेत्र (भिल्लवडी) व पंचगंगा संगम नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही दोन स्थाने म्हणजे नृसिहसरस्वतीची विशेष प्रीति असलेली ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वती दोघेही कृष्णानदीचे भक्त होते. साक्षात हरीतनु कृष्णा […]

दोन मृत्यू: एक व्यक्तीचा, एक हुद्याचा

बड्या धेंड्याचा देहान्त जाहला, राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला, जनसागर अवघा शोकसागरात बुडाला अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला का कोण जाणे कुणास कसला पत्ताच नव्हता शोक कशाला? शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले तरीही राजमहाल अपुरे पडले हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले तरी बरेच काहीसे अजूनी उरले एकाकी तू असा निजलास का रे कुणी न तुजला वारस का रे शोक […]

सुरेल आवाज आणि सहज अभिनय

आपल्या सुमधुर गळ्याने आणि तितक्याच सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची वाहव्वा मिळवून ठाण्याचे नाव संगीत रंगभूमीच्या प्रवाहात उजळवणारी अभिनेत्री म्हणजे मधुवंती दांडेकर. पुण्याला सहस्रबुद्धेंच्या घरी जन्मलेल्या मधुवंतीला गायनाचा वारसा मिळाला तो आई मनोरमाबाई सहस्रबुद्धे यांच्याकडून. आईच्या गळ्यातले गाणे लेकीच्या गळ्यात निसर्गदत्तपणे आले आणि मराठी नाट्यसंगीताच्या मैफिलीत एक कसदार सूर दाखल झाला. वयाच्या ९ व्या वर्षांपासून मधुवंतीचे शास्त्रीय संगीताचे […]

जपानमधील अप्रतिम साकुरा

भारताच्या पूर्वेला अगदी चिंचोळा, चारी बाजूंनी समुद्राचे संरक्षण असणारा, निसर्गसौंदर्याने नटलेला देश. हिमालयाच्या काही शिखरांशी स्पर्धा करू पाहणारा माउंट फुजी सारखा पर्वत, ‘लेक अशी’ सारखी विस्तीर्ण व निर्मळ तळी, पॅगोडा सारख्या उतरत्या छपरांच्या वैशिष्ठ्यपूर्ण इमारती, रस्त्याचे चढउतार, त्यावरून लगबगीने चालणारी मध्यम उंचीची गोरीपान चपट्या नाकाची माणसे….. कायकाय अन् कशाकशाचं वर्णन करावं…पण त्यातही तिथल्या चेरीब्लॉसमच्या वर्णनांनी मनावर भुरळ घातली […]

मजुराचे मनोगत

मजूराचे मन कष्ट। कंटकांचे जीवन । कथावे ते कवण । जीवन वैफल्य ॥ १ ॥ जागा ही पाव पाखा । गेला जन्म आखा। येथे का लाज राखा । धडूतही नसे ॥ २ ॥ यंत्राशी सांगे नाते । गरगरणारे पाते। कष्टतो मी स्वहस्ते । त्याले मोल नसे ॥ ३ ॥ करुण हे जीवन। भीषण ते क्रंदन । […]

एक तर्क

श्रीदत्तमहाराजांचे सद्भक्त पुन्हा पुन्हा जन्म घेऊन श्रीदत्तमहाराजांचे कार्य करत आपली आत्मिक उनती साधतात. किंबहुना श्रीदत्तमहाराजाच आपल्या सद्भक्तांना पुर्नजन्म देऊन त्यांच्याकडून इप्सित कार्य करवून घेतात. गेल्या १००० वर्षांतील दत्तभक्तीचा आणि दत्तभक्तांच्या आयुष्याचा वेध घेतला असता याबद्दल प्रचिती येते. दामाजीपंतांनी दुष्काळात अन्नधान्याचे कोठार सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले होते आणि तशीच घटना साताऱ्याचे देव मामलेदार यांच्या आयुष्यातही घडली. नावे […]

1 53 54 55 56 57 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..