डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य
कादंबरी :
1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी )
दीर्घकथा संग्रह:
1 रानोमाळ, 2 रानवा
संगीत नाटक :
1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा
गद्य नाटक:
1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल
काव्यसंग्रह:
1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला
ललित लेख: (आगामी)
1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे
कथासंग्रह:(आगामी )
1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा
बाल वाङ्मय:
1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी )
संपादन :
1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा
पारितोषिके:
1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर,
2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक
3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक
उल्लेखनीय :
* पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन
* सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण
* क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण
*आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित
* समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित
* अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन
पुरस्कार
1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार
3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार
6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार
10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार
11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार
12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम
13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार
14 आदर्श शिक्षक पुरस्कार
15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार
16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार....
हा माझा अल्प असा परिचय ...!!!
कलाकृतीचे भाग्य हेच म्हणायला हवे की एकाच लेखकाचे एक नाटक एकाच स्पर्धेत दोन वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या तारखांना सादर करणार आहेत . प्रत्येक संस्थेचे नेपथ्य वेगळे , संगीत वेगळे , दिग्दर्शन वेगळे असणार आहे . तीच ती पारंपरिक संगीत नाटके , तेच ते कथानक , तेच ते संगीत या पेक्षा वेगळी वाट शोधणाऱ्यांसाठी हा एक दिशादर्शक प्रवास आहे . […]
फितुरीने घात केला विजयनगर चा , आणि आपल्या संस्कृतीचा सुद्धा ! तो कदाचित सहज म्हणून बोलून गेला असावा , पण भारताची शेकडो वर्षांची दुर्दशा व्यक्त झाली होती. मित्रानो , केव्हा तरी जा हंपी पहायला . पर्यटन म्हणून नव्हे , तर फितुरीचे परिणाम काय होतात ते पहायला जा आणि पुढच्या पिढीला सावध करा . […]
सर्व प्रतिभावान कलाकारांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या संस्थेला वर्धिष्णू स्वरूप लाभावे , बावीस वर्षांपूर्वी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे , तो विशाल व्हावा आणि आसमंत संगीताच्या इंद्रधनुषी रंगाने व्यापून जावा यासाठी , संस्थेचे आद्यदैवत असणाऱ्या श्री नटेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !!! […]
येता जाता दंश करायला , समाजातील चिल्लरातील चिल्लर माणसाला शिक्षकच सापडतो . इतर कर्मचारी त्याला दिसत नाहीत वा त्यांच्या उपद्रव क्षमतेमुळे कुणीही त्यांच्या वाट्याला जात नाही . शिक्षक बरा , त्याला झोडताही येतो आणि फोडताही येतो … […]
अस्तित्वाचा शोध हा माझ्या सर्वच लेखनाचा महत्वाचा धागा आहे. अर्थात सर्वांच्याच प्रेरणा या अस्तित्वाच्या शोधात असतात. आज एक वेगळी कविता आपल्यासमोर सादर करतोय. […]
अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ? […]
आज २१ ऑक्टोबर आहे. साठ वर्षांपूर्वी लडाख मधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित आणि निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी गस्त घालणाऱ्या १० पोलीस जवानांवर दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी अचानक हल्ला केला, पोलिसांनी कडवी झुंज दिली. पण दुर्दैवाने हे सगळे पोलीस शहीद झाले. या घटनेमुळे देशभर शोककळा पसरली. वीर जवान पोलिसांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून सर्वाना स्फूर्ती मिळावी आणि कर्तव्य, राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. […]
मोरूचा बाप मोरूला म्हणाला , ‘ ऊठ लेका , जागा हो , तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा . आता कोणत्याही क्षणी मतांची भीक मागायला आणि आपली सेवा करावयाला विविध पक्षांचे विनम्र पाईक कर जोडून येतील , त्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे , त्यांना म्हणावे , हे आमचे अपेक्षापत्र आहे. […]
लेफ्टनंट जनरल निंभोरकरांचे ते शब्द ,पाण्याच्या त्या एका थेंबाने ऐकले आणि तो एकदम उत्तेजित झाला ..थेंब रोमांचित झाला. थेंबाचा अणुरेणू प्रफुल्लित झाला. हे काहीतरी विलक्षण ऐकायला मिळालं होतं. […]