हिमालयातील एव्हरेस्टसह जगातील चार सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करणारा आनंद बनसोडे हा सोलापूरचा तरुण महाराष्ट्रातील तमाम युवकांना प्रेरणावत ठरला आहे! त्याची शिखर सर करण्याची जिद्द आणि त्याने त्यासाठी केलेला संघर्ष जाणून घेताना आनंद बनसोडेबद्दल कौतुकच मनी दाटते. […]
पहिली मानवी हृदय-प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड अशी त्यांची ओळख निर्माण झाली असली तरी त्यापूर्वी देखील त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले होते. डॉ. बर्नार्ड यांनी धाडसीपणे निर्णय घेऊन ही शस्त्रक्रिया केली. अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी शक्यतेच्या आवाक्यात आणली. या शस्त्रक्रियेला जगात उदंड प्रसिद्धी मिळाली व त्याचबरोबर डॉ. बर्नार्डही प्रकाशझोतात आले. […]
अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे. ‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली […]
युद्ध फक्त सैनिक लढत नाहीत तर देशाच्या नागरिकांनाही संयमाचे आणि विवेकाचे युद्ध लढावे लागत असते. त्यामुळे विद्यमान नाजूक परिस्थितीत भारतीय नागरिकांनी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे. समाजमाध्यमवर व्यक्त होतांना संयम आणि विवेकाचं भान प्रत्येकाने ठेवायला हवे. देशांतर्गत शांतता बाधित होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. समोरून वार करणाऱ्याची छाती चिरता येते. मात्र, पाठीत वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. तेव्हा, जन हो सावध असा ! दक्ष असा !!रात्र वैऱ्याची आहे !!! […]
डॉ. व्हालिदीमीर डेमीखॉव्ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्यारोपण-शल्यविशारद होते. त्यांनी श्वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्यारोपण तर केलेच पण एका श्वानमस्तकाचे प्रत्यारोपणही केले. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्यांच्या या प्रयोगापासून स्फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्ह यांनी ‘ट्रान्सप्लॅन्टोलॉजी’ ह्या शब्दाला जनकत्व दिले. […]
मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल. […]
काही राजकीय पक्ष व नेते दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी रात्री १२ वाजता सुप्रिम कोर्टाचा दरवाजा ठोठतात. आज अनेक सैनिकांविरुद्ध खोटे-नाटे खटले कोर्टात चालू आहेत. पण देशातील राजकीय पक्षांचे हुशार वकील त्यांना मदत करण्यास का पुढे येत नाहीत? सैन्यावर होणार्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी, सैन्याची बदनामी करणारे व्हिडिओ पसरवणार्यांवर कारवाई होण्यासाठी राजकीय पक्ष एकत्र का येत नाहीत? […]
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. […]
दहशतवादी हल्ला झाला कि केवळ निषेधाच रडगाणं गाणारा भारत असा काही पवित्रा घेईल असे पाकिस्तनाला स्वप्नातही वाटलं नसेल! त्यामुळेच त्याची आता धांदल उडाली आहे. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास पाकी लष्कर सज्ज असल्याच्या वलग्ना पाकचे लष्करप्रमुख करत असले तरी वायुदलाच्या नुसत्या ट्रेलरने पाकची भंबेरी उडाली आहे. […]
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा दुर्दैवाने या देशाचा पहिला पंतप्रधान “I am Hindu by an accident” असे म्हणणारा निघाला. त्यामुळे तो कधी पाकिस्तानशी लढणार नाही याची देशाला खात्रीच झाली होती. त्याला तर छत्रपती शिवाजी महाराज देखील वाट चुकलेले वाटायचे. या देशात नेहरूंच्या स्वप्नाळू विदेश नीतीचे भोग अजतागायत निरपराध भारतीय नागरिक आणि सैनिक निमूटपणे भोगत आहेत. आणि “पुलवामा अतिरेकी हल्ला” ही त्याचीच परिसीमा ठरली. […]