माणूस किती असंवेदनशील बनत चाललेला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आपण इतके आहारी गेलो आहे की, आपल्यालातील एकमेकांप्रती असलेला जिव्हाळा, प्रेम,माया, ममता आणि आपुलकीची भावना नष्ट होत चालली आहे. आपण तंत्रज्ञानाच्या युगात इतके व्यवहारी होत चाललो आहोत की, आपल्याला रक्ताची नातीही कळेनाशी झालेली आहेत. कुणीही जगल्या – मेल्याचं सोयर- सुतक कुणालाही राहील नाही. […]
कोकणाच्या प्रवासाचे हे असे टप्पे – जलमार्ग, खुष्कीचा मार्ग (रस्ते), रेल्वे मार्ग आम्ही पाहिले आणू अनुभवले. पण विमानतळ तयार होऊन येथे हवाई वाहतूक सुरु होईल असे वाटले न्हवते. अजून वाशी – नवी मुंबई येथे विमानतळ व्हायचा आहे, त्यापुढे कोकणाला विमान उड्डाणाला प्रायोरिटी असेल असे वाटले न्हवते. […]
आज मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त विलीन होऊन 70 वर्षे लोटली . निजामाच्या जुलमी राजवटीपासून सुटका मिळविण्यासाठी येथील सर्व जाती-धर्मियांनी मोठ्या संख्येने घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हा लढा यशस्वी केला . भारत सरकारच्या पोलीस ऍक्शनने मराठवाडा स्वातंत्र्य भारताचा हिस्सा बनला खरा, येथील प्रश्न सुटताना दिसत नाहीत. ऐतिहासिक, संप्रदायिक, साहित्य तसेच श्रमसंपदेने संपन्न असलेला मराठवाडा आजही कृषी, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात खूप पाठीमागे असल्याचे दिसते. […]
श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’ व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल. […]
प्रत्येक मराठी मनात ‘माळव्या’ बद्दल एक वेगळीच जवळीक आणि हळवं आकर्षण आहे. इंदूर … धार … देवास … मांडू .. जीवनदात्री…गूढरम्य नर्मदा …. ही आकर्षणं तर मराठी मनात खूप आहेतंच पण अजून मोठं आकर्षण म्हणजे नर्मदेच्या तीरावरचं महेश्वर आणि अहिल्याबाई होळकर. […]
मलेरियाचे अस्तित्व पृथ्वीतलावर हजारो वर्षांपासून असल्याचा ऐतिहासिक नोंदी अनेक ग्रंथातून आढळल्या आहेत. आज एकविसाव्या शतकात निदान भारताचा विचार करताना कोणत्याही रुग्णास आलेल्या तापाचे रोगनिदान करताना मलेरिया हा रोग प्रथम विचारात घेतला जातो. […]
खरं तर आपल्या संस्कृतीचं असं कुठलंच क्षेत्र नाही, जे नागाच्या धारणेनं व्यापलेलं नाही. परंपरेने याला पृथ्वीला मस्तकी धारण करणारा सर्वश्रेष्ठ शेष म्हटलेला आहे. समुद्रमंथनात तर वासुकी नागाची दोरी देव-दानवांनी धरली होती. वास्तुपूजनाच्या विविध विधीत ज्या दहा जणांना बळी अर्पण करण्याची प्रथा होती. त्यात एक बळी वासुकी नागासाठी आहे. […]
माहिती म्हणून सांगतो, मालगाडीच्या गार्डची कॅबिन ही सुविधा शून्य कॅबिन असते. त्यात ना लाईट असतो, ना फॅन असतो, ना बर्थ असतं इतकंच काय त्या कॅबिन मध्ये वॉशरूम च्या नावाखाली फक्त भलं मोठं छिद्र असतं, रुळा कडे उघडणारं, पाणी सुद्धा नसतं हो त्या कॅबिन मधे….. […]
तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले. […]
जंगलातल्या मोकळ्या माळावर चरणांरा ‘रानगवा’ एवढ्या बेफिकिरीत वावरत असतो, की तो जणु काही त्या परिसराचा अनभिषिक्त सम्राटच आहे. त्याची ताकदच तशी प्रचंड असते. शरिराचा विलक्षण सुंदर घाट आणि पिळदार स्नायू यामुळे तो दिसतोही उत्तम शरीर कमावलेल्या पैलवानासारखा. व्यायामानं जसं पैलवानाचं शरीर चमकत असतं तशीच त्याची त्वचाही चमकत असते. त्याचं ते ‘बेरड’ रूपंच सगळ्या जंगलविश्वाला टरकावत असतं. […]