नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखूणा – ट्राम

ब्रिटिशकालीन मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे लोकप्रिय साधन म्हणून ट्राम ओळखली जायची. ससून डॉकपासून थेट किंग्ज सर्कलपर्यंत या ट्रामचे जाळे पसरले होते. ऑपेरा हाऊस, चर्नीरोड, गोल देऊळ, सीपी टँक, ताडदेव, बोरिबंदर (आत्ताचे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस), जे. जे. रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आदी अनेक भागांमध्ये या ट्रामने प्रवास करता येत असे. BEST कडून ही सेवा चालवली […]

“सन डे” च्या सुटीची कहाणी…

आपल्याकडे सर्वसाधारणपणे रविवार हा सुट्टीचा दिवस मानला जातो. या दिवशी शाळा, कॉलेजेस, बॅंका, सरकारी कार्यालये वगैरे बंद असतात. बरीच खाजगी कार्यालयेही बंद असतात. सुट्टीचा दिवस “सन डे” म्हणजे रविवारच का असा प्रश्न कधी पडलाय? या सुटीचा इतिहास काय? ही सुटी कोणामुळे मिळाली ? कधीपासून सुरु झाली असे प्रश्न आपल्याला पडत असतील पण ते आपल्या रोजच्या कामाच्या धबडग्यात मनातच विरुन जातात. […]

पुणेकरांना बोचणारं हेल्मेट !

हेल्मेटसक्ती करू नये असं म्हणणारे हेल्मेट वापरू नये असं कधीच म्हणत नाहीत. त्यामुळे हेल्मेटसक्ती ह्या विषयावर विचार करताना हेल्मेटचे फायदे तोटे ह्यापेक्षा सक्ती ह्या गोष्टीवर जरा जास्त गंभीरपणे विचार व्हावा. विशेषत: कल्याणकारी लोकशाही राज्यपद्धतीमधे कशाची सक्ती असावी आणि कशाची नसावी ह्याबाबत विचार व्हावा. हेल्मेटसारख्या गोष्टीची सक्ती करणं आणि ती पोलीस यंत्रणेमार्फत राबवणं हा लोकशाही सरकारनं केलेला […]

सारस पक्षी प्रेमी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी गोंदिया !!!!

अगदी पुराणात सुद्धा ज्याचा उल्लेख आहे आणि नेहमी जोडीने (जोडप्याने )जो फिरतो . जो आपल्या जोडीदाराला मरे पर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो.पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर […]

देशापुढील ई-कचऱ्याची गंभीर समस्या

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत होती. आगीने रौद्र रूप धारण करण्याची कदाचित बरीच करणे असतील. मुळात कचराच होऊ नये म्हणून बऱ्याच योजना आखण्यात आल्या आहेत पण देशातील नागरिक मनापासून त्यांच्या कृतीतून अंमलबजावणी करताना दिसत नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस सगळ्याच प्रकारच्या कचार्यांची समस्या देशापुढे गंभीर रूप धारण करीत आहेत. अश्याच देशापुढील ई-कचऱ्याच्या समस्येबद्दल […]

फेसबुकने फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला

गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिला आहे. त्यामुळे भारतीयांना आता त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे. गेले काही महिने रिलायन्स आणि फेसबुकने जाहिराती आणि होर्डिंगच्या माध्यमातून रिलायन्सच्या फ्री बेसिक्स प्लॅनचे जोरदार प्रमोशन केले. या मुद्द्यावर अक्षरशः रान […]

दशावतारी पेन्शन !

एकंदरीतच वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. आपल्या देशात आई-वडिलांना देवासारखा मान दिला जातो. पण काही घरात त्यांना अगदी परक्या सारखी वागणुक दिल्याचे बघुन मन अस्वस्थ होतं. खरच आपण इतके निष्ठूर, बेजबाबदार, असहीस्णू, कठोर, दगडाच्या काळजाचे झालो आहोत का? ज्या आई-वडिलांमुळे देवाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघण्याचे भाग्य लाभले. तेच आई-वडिल आपल्याला जड व्हावेत यासारखे […]

भविष्यातील उर्जेचा पर्याय – सौरउर्जा..!

मानवाच्या वाढत्या गरजा, चैन, भोगवाद, चंगळवाद आणि जगण्याच्या नाना तऱ्हा तसेच वाढलेल्या सत्ता स्पर्धा त्यातून निर्माण झालेले कलह, लढाया आणि त्याला तोंड देता देता पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भविष्यात आरोग्याच्या चिंता निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत. मानवाला आपल्या दैनदिन जीवनात रोज कुठल्या ना कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यातून वाढलेली महागाई, रोज नव्याने भेडसावणारे विजेचे आणि पावसाचे संकट. […]

चिनी माल खरेदी करणं जीवनावश्यक आहे का ?

एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर. लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. […]

संक्रांत आणि पतंगबाज

निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रातही संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात. आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी […]

1 216 217 218 219 220 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..