आपली जन्मतारीख हे एक गुढ ( कोड लँग्वेज) आहे. आपण विशिष्ट तारखेलाच का जन्म घेतला यामागे काही संकेत आहेत. ही जन्मतारीख व त्यातील महिना व वर्षाचे आकडे आपल्या आयुष्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार आहे त्याचा अंदाज देतात.. […]
भारतासारख्या “कृषीप्रधान म्हणवून घेतल्या जाणार्या” देशात आज शेतकर्यांची जी भयानक अवस्था “मायबाप सरकार” नावाच्या व्यवस्थेने करुन ठेवली आहे त्यामुळे त्याला थेट आत्महत्येचाच मार्ग अवलंबायला लागला आहे. भारत “कृषीप्रधान” वगैरे असता तर आज शेतकरी राजासारखा राहिला असता. मात्र या “कृषीप्रधान” देशाची अवस्था गेल्या काही वर्षात “दलालप्रधान” करुन ठेवण्यात आमच्या राज्यकर्त्यांचा मोलाचा हातभार आहे. […]
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी यंदाचा, ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ गेल्याच आठवड्यात जाहीर झाला. डॉ.जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. तसेच वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई […]
सध्या व्हाट्सॲपवर आपल्या देशाला India हे संबोधन कसे प्राप्त झाले त्याची निखालस खोटी व कोणताही ऐतिहासीक आधार नसलेली विकृत माहिती देण्यात येत आहे. ती माहिती अशी आहे – “INDIA – Independent Nation Decleared In August असा नामनिर्देश केल्या गेलेल्या हिन्दुस्तानला त्याचा shortform इंग्रजांनी केला INDIA..” खरी माहिती अशी आहे – आपला देश पुर्वापार काळापासून ते आतापर्यंत […]
आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द […]
एकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे काय नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच नाव ब्लॉगला दिले आणि लिहायला सुरुवात गेली…… […]
क्रेडिट कार्डावर पैसे नाहीत किंवा दुसर्या कोणत्या कारणाने तुमचं कार्ड एखाद्या दुकानात रिजेक्ट झालंय? काळजी करु नका. वाईटही वाटून घेउ नका. तुमचंच काय… जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अधयक्षांचंही कार्ड रिजेक्ट होऊ शकतं. किंबहूना झालंय. […]
येथे दर पाच वर्षांनी सत्तानारायणाची पूजा होते. सत्तानारायण प्रसन्न झाला तर पूजा करणारा नगरसेवक होतो, आमदार होतो, खासदार होतो, पाच वर्षात त्याची भरभराट होते. प्रत्येक वर्षाला त्याच्या एका पिढीची ददात मिटते. पाच वर्षात पाच पिढ्यांची भरभराट होईल इतकी माया जमते. एका बंगल्याचे पाच बंगले होतात, पाच वर्षात पाच पंचतारांकित हॉटेले बांधता येतात, पेट्रोल पंप विकत घेता येतात…. […]
गोव्याचे उपमुख्यमंत्री श्री फ्रान्सिस डिसूझा यांचे “भारतात राहणारे सर्व भारतीय हिंदूच आहेत” – या मोठ्या मनाने केलेया विधानाबद्दल अभिनंदन करावयास हवे. हे विधान केल्याने त्यांच्या काथोलिक असण्यावर कुठलीच बाधा येत नाही. […]
२०१४ चे अर्धवर्ष सरत असताना आपल्या मराठी चित्रपटांचा कानोसा घेताल्यावर एक बाब लक्षात येईल की पारंपारीक चौकट मोडून समांतर तसंच “ऑफबीट” विषयांच्या सिनेमांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. कुठेतरी सिनेमा हे माध्यम म्हणून लोकांपर्यंत प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत कशा पध्दतीने पोहचेल असा विचार सध्याचे चित्रपट निर्माते करतना दिसताहेत; तंत्रात आधुनिकतेसोबतच, मार्केटींगचा प्रभावी वापर हे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल… […]