आजही फोटोग्राफीचं हे विश्व म्हणजे छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी फार आकर्षक … यात त्यांचे पंचप्राण गुंतलेले. फोटोग्राफीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यक्त होण्याचे आयाम कमालीचे उंच झाले आहेत … अलिबाबाची ही पार अनंत काळाला व्यापणारी जादुई गुहा आहे. काय करत नाही कॅमेरा …. सगळं सगळं करतो … कमालीच्या गोष्टी करतो . […]
पृथ्वी झुकते आहे… खरं तर, पृथ्वी साडेतेवीस अंशांनी अगोदरच झुकली असल्याचं सर्वज्ञात आहे. पण ती आणखी झुकते आहे… पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते आहे, तो अक्ष आणखी कलतो आहे. परिणामी, पृथ्वीचे ध्रुव बिंदूही सरकत आहेत. अक्षाच्या दिशेतला हा बदल पृथ्वीवर होत असलेल्या बदलांमुळे होत आहे. नैसर्गिक कारणांमुळे असे बदल घडून येत असले, तरी या कारणांना अनेकवेळा अप्रत्यक्षपणे मानवी हातभारही लागलेला असतो. […]
तक्षशिला विद्यापीठाला सर्वप्रकारचे वित्तीय सहाय्य समाजाकडून केले जात असे. कारण गुरु, विद्यार्थ्यांची भोजन व वास्तव्याची सोय करीत असत. कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क भरायची सक्ती नसे. […]
आम्ही या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेला गेलो होतो. या छोटयाशा तीन आठवडयांच्या ट्रीपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर इथले सुपर हायवेज – एक्सप्रेसवेज. खरंच फार सुंदर आणि शिस्तशीर आहेत. या रस्त्यांवरून कोणीही अगदी आरामात एका दिवसात (१०-११ तासात) एक हजार किमीचा प्रवास करू शकतो. […]
विद्यापीठात वेगवेगळे पाठ्यक्रम शिकवले जात. त्यात वेद त्यांच्या सहायक सहा शाखा. वेदाचे योग्य ऊचारण, वेगवेगळे साहित्य, विधी, यज्ञ व्याकरण, जोतिषशास्त्र , छंदशास्त्र आणि त्याची व्युत्पत्ती, या अभ्यासाचा उपयोग वेद आणि त्याच्या शाखा यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी होत असे. […]
धायरी पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळाआहे. इव्हान आलीच यांनी युरोप मध्ये डी-स्कुलींग ही चळवळ सुरू केली होती.स्कूल मध्ये जे आपण कप्पे केलेत विषयांचे असो वर्गांचे असो वयांचे असो स्कूल ड्रेसचे असो यांच्या पलीकडचं जे आहे ते सर्व डीस्कुलींग मध्ये येतं. […]
तक्षशिला हे भारतातली व जगातील प्राचीन विद्यापीठापैकी एक विद्यापीठ होते. त्याकाळात भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती, हे समजून येते. या विद्यापीठाचा काळ सुमारे १००० वर्ष ख्रिस्तपूर्व ते इसवि ५०० मानला जातो. […]
‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम’ – जीपीएस – ही आजच्या काळातली आघाडीवरची स्थानदर्शक पद्धत आहे. एखाद्या माणसाचं वा वाहनाचं स्थान निश्चित करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत प्रथम, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहाद्वारे रेडिओ लहरी सोडल्या जातात. […]
दि. १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली त्या घटनेना आता १७० वर्षे झाली. भारताच्या अर्थकारणात आणि नागरीकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडण्यात रेल्वेचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश काळात भारतीय रेल्वेचा पाया रचण्यात नामदार नाना जगन्नाथ शंकरशेट हे अग्रेसर होते. त्यांच्या अफाट कार्याचा परिचय आजच्या पिढीला होणे आवश्यक आहे… […]
काही प्राणी उष्ण रक्ताचे असतात, तर काही प्राणी थंड रक्ताचे असतात. उष्ण रक्ताचे प्राणी आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतात. त्यामुळे उष्ण रक्ताचे प्राणी तापमानातील बदलांना अधिक समर्थपणे तोंड देऊ शकतात. थंड रक्ताच्या प्राण्यांना मात्र शरीराचं तापमान नियंत्रित करता येत नसल्यानं, या थंड रक्ताच्या प्राण्यांची बदलत्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता मर्यादित असते. […]