ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. […]
हे झाड उत्तम सावली व सुंगधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे. दरवळ म्हंटल की, फुलांचा असं एक समीकरण आहे. फुलांचे अनेकविध प्रकार आणि मनात भरून टाकणारे त्यांचे सुवास. प्रत्येक फुलाचा वास वेगळा आणि रुबाब त्याहून वेगळा. सुगंधाची उधळण करणारी अशी कित्येक फुलं आहेत परंतु मूकपणा जवळ बाळगणारी अशी ही बकुळच. […]
“पर्यावरणाचा र्हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
पर्यावरण र्हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो . […]
जीवनात प्राधान्यक्रम चुकला की आयुष्य जसे भरकटतं तसंच अभ्यासक्रमाचं झालंय.अभ्यासक्रमातील अनेक बाबी अनावश्यक व अवजड असल्यामुळे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रम कमी केला गेला. काहीजणांच्या मते वगळलेले भाग आवश्यक होते अशी ओरड झाली. […]
सावरकर कुटुंब मूळचे कोकणातील,गुहागर जवळील सावरी गावाचे, त्या गावात सावरीची खूप झाडे होती त्यामुळे त्याचा अपभ्रंश सावर झाला. सावरचे म्हणून सावरकर. पण त्यांचे पूर्वज पेशव्यांचा दरबारात रुजू झाले. त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यानी सावरकर कुटुंबाला नाशिक जवळील भगुर गांव वतन म्हणून दिले. त्याच बरोबर एक तलवार व एक अष्टभुजा देवीची पितळी मूर्ती मिळाली. त्याची स्थापना देवघरात करण्यात आली. याच भगुर येथे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ साली झाला. […]
रणदीप हुडा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पाहिला. आज हा लेख लिहिण्याचा उद्देश या सिनेमाची समिक्षा करणे हा नसून , ३ तासांत सावरकर नावाचे विद्वान ज्वालामुखी पडद्यावर साकारणार्या रणदीप हुडाची वारेमाप स्तुती करणे , या सिनेमात येणारी पात्रं ही सावरकर या व्यक्तिमत्वाची व्यापक प्रतिमा उंचावणार्या पद्धतीने दिग्दर्शित करणार्या रणदीपचं कौतुक करणं — हा आहे! […]
समाजातील एका अनिष्ट प्रथेमुळे किती जणांचं आयुष्य पणाला लागू शकतं याची कल्पनाही आपण करु शकत नाही.आजही आपल्या देशात स्त्री ला किती दुय्यम वागणूक दिली जाते हे लक्षात येतं.वास्तवीकत: स्त्री ही पुरुषापेक्षा कैक लक्ष पटीने श्रेष्ठ आहे आणि संसार छान चालायला जितकी पुरुषाची तितकीच स्त्री ची भूमिकाही महत्वाची असते ! एखाद्या घरी पुरुष गेला तर त्याच्यापश्चात् स्त्री फारच क्वचित पुनर्विवाह करून पुढील आयुष्य जगते. […]
भारतातील सर्वात मोठी प्रथमश्रेणी क्रिकेट स्पर्धा अर्थात प्रतिष्ठेच्या ‘रणजी करंडक’साठीचा २०२३-२४ चा हंगाम १४ मार्चला संपला. रणजीच्या अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या मुंबईने १९३४-३५ मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून विक्रमी ४२व्यांदा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली. […]
जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे. […]
निरगुडी किंवा निर्गुंडी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध रोग व दुखण्यांवर गुणकारी असणाऱ्या काही थोड्या वनस्पतींमध्ये निरगुडीचा समावेश होतो […]