अशी ख्याती प्राप्त झालेली राम कथा म्हणजे वाल्मिकींच्या अलौकिक प्रतिभेचा अनुपम आविष्कार! वाल्मीकिंनी रचलेले रामायण हे महाकाव्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या साहित्यातील पहिले महाकाव्य होय. म्हणून त्यांना आदिकाव्य आणि महर्षी वाल्मिकींना आदि कवी संबोधिले जाते. या ग्रंथात कवीने 24000 संस्कृत श्लोक 7 कांडामध्ये विभागून संपूर्ण श्री रामचरित्र अत्यंत कौशल्याने गुंफले आहे. […]
सलग सहा वेळा एकाच जहाजावर पाठवल्यानंतर कंपनीने मला यावेळी इंडोनेशियात दुसऱ्या जहाजावर पाठवले. जकार्ताहून एक तासाची फ्लाईट पकडुन जांबी या शहरात रात्री हॉटेलला थांबून पहाटे पाच वाजता कंपनीचा एजंट त्याची इनोव्हा घेऊन आला होता. […]
आपला 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले, तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. वनवासाला गेलेला राजा राम परत आला तो प्रभू रामचंद्र म्हणून. यामागे तपश्चर्या होती. त्याग होता. समर्पण होते. सर्वांना हृदयात सामावून घेण्याचे लोकोत्तर गुण होते. […]
ईशवास्य उपनिषद हे अत्यंत गहन, अर्थपूर्ण व अथांग असे उपनिषद आहे. केवळ १८ श्लोक इतके लहान, पण अर्थाच्या दृष्टीकोणातून तितकेच मोठे आणि आ विश्वे व्यापून उरलेले उपनिषद. यजुर्वेदाच्या वाजसनेय संहितेमध्ये ईशवास्य उपनिषद आढळते. […]
….. असा हा उत्कृष्ट क्रिकेटपटू अजिंक्य मनाला भावतो ते, एक व्यक्ती म्हणून त्याने वेळोवळी दाखवलेल्या सुजाणपणाने आणि परिपक्वतेमुळे. एवढे कर्तृत्व दाखवूनही त्याने कधी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. साध्या, शांत स्वभावामुळे अजिंक्य आपल्या आसपासचा एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातला एक गुणी, सुसंस्कृत मुलगाच वाटतो. […]
ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. […]
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. […]
वडील, या शब्दात सगळ काही सामावलेले असते. ते कसे बघुया. वडील म्हणजे आधार. प्रत्येक व्यक्तीला जीवनात आधाराची गरज असतेच आणि जर त्या वेळेस त्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचा आधार भेटला तर तो पूर्ण जग जिंकू शकतो. बाप हा त्याचा मुलाला जन्म देण्या पासून ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला यश कस प्राप्त होईल ते बघत असतो. मुलं पण जर स्वतःच्या बापाचे कष्ट समजून घेणारे असतील तर बाप नक्कीच यशस्वी होतो. […]
गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती. […]