नवीन लेखन...

‘संगीतभूषण’ पंडित राम मराठे यांची स्वाक्षरी

एका दिवसात सौभद्र, सुवर्णतुला, स्वयंवर या तीन नाटकात तीन कृष्ण साकार करणे ही सोपी गोष्ट नव्हती ती त्यांनी केली. त्यांचे ‘ जय जय गौरीशंकर ‘ तर आजतगायत कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी चित्रपटातून भूमिकाही केल्या त्यात व्ही. शाताराम यांचा ‘ माणूस ‘ चित्रपट आपण विसरू शकत नाहीत. […]

अभिनेता सिद्धार्थ जाधव याची स्वाक्षरी

माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचे खरे असणे किती म्हणवाचे असते हे सिद्धार्थच्या यशावरून आणि त्याच्या माणूसपणावरून दिसून येते. सिदार्थ जाधव याला खरा हात दिला तो केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे ‘ या नाटकाने. अभिनेते संजय नार्वेकर यांना सिद्धार्थ खूप मानतो. केदार शिंदे यांच्या ‘ लोच्या झाला रे …’ या नाटकांनंतर खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला असे म्हणता येईल […]

घाईत घाई…

शांत, संथ लयीत चालणारं आपलं जीवन आपणच घाई गर्दीत हरवून टाकतोय असं नाही का वाटत. काय फरक पडतो थोडसं सिग्नलवर थांबलं तर.. काय फरक पडतो एसटीत चढतांना थोडा संयम बाळगला तर. काय फरक पडतो.. रांगेत उभे असताना थोडी शिस्त बाळगली तर… पटतं सगळं.. पण वळत नाही.. काय करणार…! […]

अधिकार

अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत.  व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे. […]

सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांची स्वाक्षरी

ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. […]

ईश्वर नाम भाषेचे जनक – श्री संत राममारुती महाराज

(लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी) – युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ? […]

चर्चेचं गुऱ्हाळ

जेवण वैगरे आटोपून आपण थकुन अंथरुणावर पडतो. मात्र तिथे देखील मन आपल्याला शांत बसु देत नाही. अनेक विचार मनात जन्म घेत असतात. मग आपण चर्चा करत राहतो आपल्याच मनाशी बराच वेळ… झोप येईपर्यंत. चर्चा काही आपला पिच्छा सोडत नाही हे मात्र खरे…! […]

सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांची स्वाक्षरी

शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.
[…]

अभिनेते ओम पुरी यांच्या जन्मतारखेची मजा..

ओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली. […]

संवाद……. कधीही महत्वाचा !

सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. […]

1 226 227 228 229 230 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..