नवीन लेखन...

नवं न्यारं अन् खळ्यात उपनेरचं वारं !

जगण्याचा खरा आनंद हा बालपणीचाच. गावखेड्यातलं जगणं म्हणजे मुक्त छंदातील कविता! मोकाट भटकायचं.मनसोक्त पोहायचं. वाट्टेल तसं जगायचं.गावात जशी माळवदाची घर तशी रानात खळं-दळं, बोंदरी बारदाना आलाच. शिवळाट-जोते, चाढं-ओटी , इळे-खुर्पे, सुतळी दाभण, डांभमेखी. जगातील कोणत्याच शब्दकोशात न सापडणारी शब्दसंपदा. जवळची वाटणारी. ऊन्हाळ्यात रानं निपचित पडल्याली. दिवसभर उन्हाच्या झळायांचा आलेख खालीवर होणारा.खळं आणि जागली ठरलेल्या. आंब्याच्या कैर्या आणि […]

कुत्रा – एक वेगळा विषय

मला कुत्रा या प्राण्याची फार ओढ. मलाच कशाला, आमच्या घरातील सर्वांनाच कुत्रा प्रिय. तसे सर्वच प्राणी आम्हाला आवडतात, परंतू मुंबईसारख्या शहरात त्यातल्या त्यात कुत्रा पाळणं सोयीचं, म्हणून कुत्रा एवढंच. मांजरही तशी छान वाटते, पण तिचा आपल्या विषयी पुरेसा विश्वास पटेपर्यंत ती काही आपल्या वाऱ्याला उभी राहात नाही. आणि एकदा का ती आपली झाली, की तिचा स्वत:चा […]

खलनायक नही नायक हूं मै : प्राण

आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातुन मुक्त व्हायला आणखी २७ वर्षांचा कालावधी होता. दिल्लीतल्या बल्लीमारन या वस्तीत नेहमी प्रमाणेच धावपळ असायची. माणसांची गर्दी, कामाच्या ओढीने बाहेर पडणारे जथ्थे, हातगाडी वाले, मध्येच वाजणाऱ्या सायकलरिक्षांच्या घंटा वगैरे..काहीशा अंधारलेल्या या गल्लीच्या शेवटी काही जुन्या उदासिन हवेल्या पण होत्या. आताही आहेत. अशा प्रकारची एकतरी गल्ली भारतातील सर्वच शहरात आजही आढळते. “सौदागरन” अशी […]

अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला; तेजोभंगाचा एक मार्ग

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यावरून मला, का कोण जाणे, पण यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन उर्फ गझनीच्या महमूदाने सोमनाथावर केलेल्या हल्ल्याची आठवण होते. अमरनाथ आणि सोमनाथ, दोन्ही भगवान शंकराची नांवं. भगवान शंकर हे या देशाचं आराध्य दैवत. आसेतूहिमाचल कुठेही गेलो तरी महादेवाचं मंदीर, अगदी गेला बाजार एखादं शिवलिंग हमखास सापडणार. देशातलं कोणतंही गांव याला अपवाद […]

वजनदार सुराची टूणटूण

इतरांच्या शारीरीक व्यंगावर हसणे या सारखे दळभद्री काम जगात कोणतेच नसेल. स्वत:ची खिल्ली उडवणे किंवा आपल्यावरच व्यंग कसणे ही अत्यंत अवघड गोष्ट. चार्ली चॅप्लीनने तर स्वत:चीच इतक्या टोकादार पणे खिल्ली उडवली की तो आमच्याच वर्मावर घाव घालत होता हे आम्हाला कळलेच नाही. लॉरेल हर्डी या शारीरीक विजोड जोडीने आम्हाला खदखदून हसवले. भारतीय चित्रपटसृष्टीत देखिल असे अनेक […]

एक मद्यपी

एक मद्यपी एका गुरूंकडे गेला. म्हणाला, मला संन्यास घेण्याची प्रबळ इच्छा आहे. अनेक गुरूंना मी भेटलो आहे. पण, मी पक्का दारुडा आहे. मला सकाळी तोंड धुतल्याबरोबर पहिला पेग लागतो. रात्री झोपेपर्यंत मी अनेक बाटल्या रिचवतो. सगळे गुरू म्हणतात आधी दारू सोड. मग तुला संन्यास देतो. तुमचं काय म्हणणं आहे? हा गुरू जरा वेगळा होता. तो म्हणाला, […]

सूर्यप्रकाश

पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये २९ सप्टेंबर २०१६ पासून तब्बल चार महिने अनन्वित यातना सोसणाऱया भारतीय जवान चंदू चव्हाणांची अखेर जानेवारीत सुटका झाली. त्यानंतर त्यांनी इ-सकाळ ला दिलेल्या मुलाखतीचा अंश […]

चिर तरूण सदा बहार : जोहरा सैगल

काही काही माणसं बहूदा जन्मताच बंडखोर असतात. सर्वमान्य प्रचलीत रिती परंपंरा वा चौकटीबद्ध आचरण त्यांच्या स्वभावातच नसते. लोक काहीही म्हणोत ते आपला मार्ग सोडत नाहीत. मात्र स्त्रियांच्या बाबतीत तर असे आभावानेच आढळते. विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात एखाद्या रूढीवादी कुटूंबात जर असे कोणी वागत असेल तर महा कठीण…..उत्तर प्रदेशातील साहिबज़ादी ज़ोहरा बेगम मुमताज़ उल्लाह खान हीचा जन्म झाला […]

जाने वो कैसे लोग थे – गुरूदत्त

चित्रपटातील गाणे उत्कृष्टपणे कसे चित्रीत करावे यासाठी प्रसिद्ध असणारे दोन नावे म्हणजे विजय आनंद आणि गुरूदत्त. प्यासा मधील जाने वो कैसे लोग थे जिनको…..या गाणे जर बारकाईने न्याहळले तर झूम इन आणि झूम आऊट या तंत्राचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. […]

हिरो नव्हे अभिनेता : संजीवकुमार

७० च्या दशकातील ही घटना आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक ए.भिमसिंग हे दिलिपकुमार यांच्याकडे चित्रपटाचा एक प्रस्ताव घेऊन् गेले. ए.पी. नागराजन हे प्रसिद्ध तामिळ लेखक-दिग्दर्शक त्यांचे मित्र. त्यांनी १९६४ मध्ये शिवाजी गणेशन् यानां घेऊन “नवरात्री” हा चित्रपट तयार केला होता. ए.भिमसिंग यानां या चित्रपटाचा हिंदी रिमेक करायचा होता. दिलीपकुमार यांनी पटकथा लक्षपूर्वक वाचली आणि ते म्हणाले- “हा […]

1 259 260 261 262 263 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..