नवीन लेखन...

आठवण काचेच्या विविधरंगी बांगड्यांची

गावात रामदास नावाचे कासार होते ..ते गल्लोगल्ली बांगडी, बिल्लोर म्हणून आवाज द्यायचे …मग त्यांना आवाज दिला की ते घरी येऊन….बांगड्या हातात भरून देत असत.. विविध रंगी बांगड्या काय मन मोहून घ्यायच्या म्हणून सांगू…..रामदास दादांचा स्वभाव खूप मिश्किल होता.सदोदित चेहऱ्यावर हास्य. […]

बर्म्युडा

जवळपास सगळ्या शहरात हे चित्र दिसते. पनीर पिझ्झा खाऊन गुबगुबीत झालेलं कुत्रं मालकासोबत डुलत डुलत अख्ख्या कॉलनीत फिरून वजन हलकं करूनच घरी जातं. त्याच्या सर्व विधी आटोपतांना मालकाच्या चेहर्‍यावर इतके संतुष्टीचे भाव उमटतात की जणू काही त्यांचाच भार कमी झालाय. […]

माझी मराठी

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या. […]

श्वेतांबरा

आज नवरात्रीचा दुसरा दिवस..देवी ब्रह्मचारिणीचा.. देवी ब्रह्मचारिणी म्हणजे देवी पार्वती. शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीने घोर तपश्चर्या केली..साहजिकच या काळात ती शुभ्रवस्त्र परीधान करीत असे.. म्हणूनच आजच्या दिवशी महिला पांढरेवस्त्र परीधान करून देवी ब्रह्मचारिणीची पूजा करत आहेत.. […]

संस्कार, विचार आणि विवेक

सामाजिक बदलांचा आणि आर्थिक विकासाचा वेग जसजसा वाढत चालला, तसतसं माणसाचं राहणीमान झपाट्यानं उंचावत चाललं. विज्ञानानं असंख्य सुखसुविधा निर्माण केल्या. शिक्षणाचा प्रसार वाढला. ज्या समाजात ‘व्ह. फा. ‘पर्यंत शिकणाऱ्या मुला-मुलींकडे लोक आदरानं बघत होते, त्याच समाजात घरोघरी पदवीधर दिसू लागले. जास्तीतजास्त उच्च शिक्षण घेतलेला, नोकऱ्यांमध्ये मानाच्या जागा मिळवणारा आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असा एक नवा वर्ग, उच्च मध्यमवर्ग निर्माण होऊ लागला. […]

बहु काय बोलू आतां..?

मराठीची पताका क्षितिजापार नेऊन ठेवणारी ज्ञानशलाका म्हणजे ज्ञानेश्वरी.. महाराष्ट्र शारदेच्या चरणी तिच्या सुपुत्राने अर्पण केलेलं सदोदित सहस्त्रदलकमल म्हणजे ज्ञानेश्वरी, माऊलीच्या कळवळ्याने भक्ती-ज्ञानाचा साक्षात अमृतार्णव पाजणारी चिद्विलासी अखंडता म्हणजे ज्ञानेश्वरी. […]

मुक्ती

आयुष्याच्या प्रवासात बर्‍याच घटना घडत असतात.कधी त्या आनंददायक असतात,कधी क्लेशदायक कधी मजेशीर,कधी खट्याळ,कधी खट्टया-मिठ्या तर कधी… विलक्षण…आणि अविश्वणीय…असाच एक अनुभव आपल्याशी शेअर करतोय… […]

जत्रा

मोठ्याबाबा हे आमचं खांबे गावचे ग्रामदैवत! कायम सुखा दुःखाला आम्ही त्याला साकडं घालणार “यंदाचा पाऊस, कसा? काय? किती? कधी? कोणत्या नखितरात ? पिकं कोंती करू? दुखणं, बहानं, पोरा पोरींच्या लग्नाच्या अडचणी, सासु सुनाचा तंटा, पोरीचा सासुरवास ” या सगळ्या गोष्टींना आम्ही तिथं देवापुढे गाऱ्हाणं मांडायचं अन् मग तिथून एकदा हिरवा देवानं कंदील दिला की तसं घडलंच समजायचं. म्हणून सगळ्यांचा तिथं जाम विश्वास बसलेला. […]

महाराजा सयाजीराव आणि महात्मा गांधी

महाराजा सयाजीराव यांचे बडोदा राज्य आणि महात्मा गांधीजी यांचे जन्मगाव एकाच म्हणजे गुजरात राज्यात येते. महात्मा गांधीजी आणि महाराजा सयाजीराव यांचा स्नेह दृढ होता. […]

कॅाफी पुराण

घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली. […]

1 37 38 39 40 41 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..