नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन

अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले. […]

पांढरा शर्ट खाकी पँट

शैक्षणिक मुल्ये, संस्कार, निती , शैक्षणिक क्रांती हे सगळं पांढऱ्या शर्ट आणि खाकी पँट सारखं काळाच्या पडद्या आड जाऊ लागले आहे आणि ह्याला जबाबदार अशा शाळांचे चोचले पुरविणारी पांढरा शर्ट आणि खाकी पँट घालून शिकलेली तुमची आणि आमची पिढीच आहे. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५३ – अजीजन बाई

अजीजन बाई एक गणिका होत्या, पण मनातून क्रांतिकारी. आपल्या जवळची सगळी संपत्ती त्यांनी नाना साहेबांना दिली, देश सेवेसाठी. फक्त धनच नाही दिले तर स्वतः त्याच्याबरोबर रणभूमीवर सुद्धा उतरल्या. त्या पुरुषाचा वेष करत, कमरेला तलवार आणि हातात बंदूक, घोड्यावर स्वार होऊन रणभूमीत उतरत. त्यांनी एक गणिकांची टोळी बनवली, त्याला ‘मस्तानी टोळी’ असं नाव दिलं, प्रत्येकीला बंदूक चालवायला, तलवार चालवायला शिकवलं. जखमी क्रांतीकारकांवर इलाज करणे, त्यांना खायला-प्यायला देणे, दारुगोळा पुरवणे, अशी सगळी काम अजीजन बाईच्या नेतृत्वाखाली ही मस्तानी टोळी करत असे. वीर सावरकरांनी सुद्धा आपल्या पुस्तकात अजीजन बाईंचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, ‘अजीजन बाईंच्या हास्यावर सगळे फिदा असत, त्यांचे मधुर हास्य वीरांना प्रेरणा देत असे परत रणांगणावार जाऊन शत्रूला सामोरे जायला, परंतु एखादा जर युद्धाला पाठ दाखवून आला तर अजीजन बाई कडून त्यांना चांगलाच ओरडा बसत असे. त्या स्वतः कायम युद्धभूमीवर शत्रूवर तुटून पडत असे.’ […]

नाटकाचे ठेकेदार

मराठी भाषा मोठी गमतीदार आहे, शब्दांचे अर्थ तुम्ही कोणत्या भावनेनं तो शब्द वापरताय यावरही अवलंबून असतात. ‘ठेकेदार’ या शब्दाला खरंतर एक नकारात्मक, उपहासात्मक अर्थ चिकटलेला आहे. पण या लेखनाच्या शीर्षकात मात्र तो अतिशय कौतुकाने, आपलेपणाने वापरला आहे. ठाणे शहरात जेव्हा बंदिस्त नाट्यगृहच नव्हते, तेव्हा स्टेज बांधण्यापासून ते रस्त्यावर फिरून नाटकाच्या जाहिराती वाटण्यापर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या अत्यंत नियोजनपूर्वक […]

घेई छंद! (आठवणींची मिसळ ११)

मध्यंतरी आपल्या गृपवर डॉ. हरि नरके यांचे सह्या जमवण्याच्या त्यांच्या छंदात आलेल्या अनुभवाबाबत एक पत्र पोस्ट केले होते. त्यांच्या छंदाच त्यानी छान वर्णन झालं होतं. ज्या ज्या कार्यक्रमाला ते हजर रहात त्या त्या कार्यक्रमांतील मंचावर असणा-या सर्व मान्यवरांच्या सह्या ते घेत असत. त्या सर्वाची तपशीलवार नोंद ते ठेवत. त्यानी खूप श्रमांनी हा छंद जोपासल्याचे जाणवले. असे छंद मनापासून केल्याशिवाय जोपासणे कठीण असते. त्यासाठी चिकाटी, वेळ आणि थोडा फार पैसाही खर्च करावा लागतोच. त्यांनी पत्र लिहिलं होतं ते त्यांना आलेल्या कटु अनुभवासंबंधी. एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकाराने सही घेण्यासाठी भरपूर मोठी रक्कम मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. सर्वानीच त्या कलाकाराचा धिक्कार केला. ते सर्व वाचताना माझ्या कांही छंदाबद्दलच्या आठवणी जाग्या झाल्या. मग त्याही तुम्हाला सांगाव्यात असे वाटले. […]

उगाच काहीतरी – ४ (आमच्या आधीच्या पिढीचे दुःख)

आमच्या ओळखीचे एक मावशी आणि काका आहेत. दोघं ही रिटायर्ड शिक्षक. दोघंही उत्तम तब्येत राखून आहेत. मुलं माझ्याच वयाच्या आसपास. मोठा उमेश नोर्वे ला स्थायिक आहे आणि धाकटा राजेश हैदराबादला असतो. मुलं आमची लहानपणापासून मित्र. मावशी फेसबुक आणि व्हॉटसअप वर फुल्टू ॲ‍क्टिव. काका आपलं काहीतरी थातुर मातुर टाकत असतात जास्त करून या ना त्या पोस्टवर कॉमेंट […]

भारतमातेच्या वीरांगना – ५२ – महाराणी जिंद कौर

दुलीप सिंघ केवळ ९ वर्षाचे होते आणि राज्याला ब्रिटिशांना विरुद्ध पाहिले युद्ध लढावे लागले. राणी जिंद कौर ह्यांनी जबरदस्त मुकाबला केला, पण त्या असफल झाल्या आणि सत्तेवर इंग्रजी हुकुमातीचा हात आला. दुलीप सिंघ अजूनही राजेच होते, पण मुख्य कारभारात इंग्रजांनी त्यांच्या माणसांची नेमणूक केली. राणी जिंद कौर ह्यांच्या हातून सत्ता गेली. तरी त्या पुढचे जवळपास ५-६ वर्ष संघर्ष करत राहिल्या, इंग्रजांच्या नाकी नऊ आणणारी ही राणी त्यांच्यासाठी भीतीचे कारण बनली. इंग्रजांनी राणीची बदनामी सुरू केली, त्यांना ‘बगावती’ म्हणू लागले. आईबरोबर राहिला तर राजकुमार दुलीप सिंघ ब्रिटिश विरोधी होतील म्हणून त्यांनी ९ वर्षाच्या दुलीप सिंघ ह्यांना इंग्लंडला पाठविले आणि महाराणी जिंद कौर ह्यांना त्यांच्या केसांनी पकडून फरफटत कारावासात बंद केले. उत्तर प्रदेश च्या किल्ल्यातून त्या पळून गेल्या आणि नेपाळ ला वास्तव्य केले. आपल्या मुलापासून दूर. ११ वर्ष त्यांचे वास्तव्य नेपाळ मध्ये होते.तिथल्या महाराजांनी राणीला सुरक्षित ठेवले आणि त्याच्या मान मुरतब्यासह ठेवले. […]

कंटोळी

कंटोळी हा प्रकारच एवढा आकर्षक आहे की ती भाजी बघता क्षणी लक्ष वेधून घेते. डार्क किंवा लाईट पोपटी आणि हिरवा रंग. पातळ आणि लांब सडक देठ, एखाद्या खात्या पित्या घरच्या व्यक्तीच्या सुटलेल्या पोटासारखा गोल गरगरीत आकार आणि त्यावर असणारे संपूर्ण मऊ टोकदार काटे. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५० – सरला देवी चौधरानी

१५० वर्षाचे पारतंत्र्याचे पाश तोडायचे होते, सोपं नक्कीच नव्हतं. लोकांची मानसिकता बदलायची होती, सोपं नक्कीच नव्हतं. आपण पारतंत्र्यात आहोत हे जन-मानसात रुजवायच होतं, सोपं मुळीच नव्हतं. एखाद्या शत्रूची आधी तो आपला शत्रू आहे म्हणून जाणीव करून देणे गरजेचे आणि मग त्याच्याविरुद्ध लढा. काम कठीण होतं, पण आपण भारतीय आहोत, मुळातच चिवट असतो, तेच आपल्या आधीच्या पिढीने केले, वेग-वेगळ्या पद्धतीने जन-जागरण. सरला देवी चौधरानींनी गाण्याच्या माध्यमातून, साहिताच्या माध्यमातून देशातील काना कोपरयात स्वातंत्र्य संग्राम पोचवला. […]

अण्णाभाऊ साठे, समजावून घेताना

अण्णाभाऊ साठे सध्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांचे साहित्य आज अमर आहे. साहित्यिक कधी मरत नसतो तो पुस्तक रूपाने अमर असतो. पाच वर्षांनी मंत्री संत्री बदलतील पण साहित्यिकाचे पुस्तक अथवा नाव बदलत नाही. साहित्यिकाचे नाव पिढ्यानपिढ्या जिवंत राहते वाचन संस्कृती जपत असताना. भरपूर साहित्यिकांची पुस्तके वाचाव यास मिळाली त्यापैकी अण्णाभाऊ साठे, बाबा कदम, बाबुराव अर्नाळकर, विश्वास पाटील, रणजीत देसाई, प्राध्यापक […]

1 89 90 91 92 93 304
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..