“सहेला रे” प्रचंड तरल आहे. हा चित्रपटगृहातील पॉपकॉर्न गर्दीत किंवा घरच्या टीव्ही वर परिवारासमवेत पाहण्याचा अनुभव नाही. डोळसपणे निर्मात्यांनी तो “प्लॅनेट मराठी ” वर रिलीज केलाय,जो फक्त आपल्या एकांतातील संगणकावर/लॅपटॉप वर निगुतीने बघावा. […]
सावरकरांचा जन्म १८८३चा तर सुभाषबाबूचा १८९७ चा दोघेही पराकोटीचे देशभक्त,दोघेही लंडनला गेले. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तर सुभाषबाबू आय सी एस ( हल्लीचे आय ए एस ) होण्यासाठी गेले. साल १९२१ मध्ये सावरकरांना भारतात आणले तर सुभाषबाबू आय सी एस चि नोकरी सोडून भारतात आले. […]
इंग्लंडला जायच्या आधीच सावरकर यांच्यावर मेझीनीचा प्रभाव होता. त्यांच्या लक्षात आले,”अभिनव भारत “ मध्ये जो क्रांतिकारी विचार आपण अवलंब करीत आहोत तेच काम मेझीनीने त्याच्या काळात करत होता. […]
लोकमान्य टिळक आणि सावरकर हि गुरु शिष्याची एक आदर्श जोडी होती. न. चि केळकर यांनी ८ ऑगस्ट् १९४१ च्या केसरीत लिहिले होते की “ सावरकर यांच राजकारण टिळकांच्या कित्त्यावर तेलकागद ठेवून काढलेल्या पुस्तीसारखे आहे “ खरे तर राजकारण नव्हे तर अनेक बाबतीत गुरुशिष्या सारखे होते. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. माधुरी विजय भट यांनी लिहिलेला हा लेख श्री ज्ञानेश्वरांनी पाया घातलेल्या भागवतधर्माच्या मंदिरावर कळस चढविण्याची कामगिरी देहूच्या तुकोबारायांनी पार पाडली. जगामध्ये पूर्वीपासून तसेच आजही भारतीय अध्यात्मविद्या हीच अग्रणी राहून मार्गदर्शन करीत आहे. भारतीय संतांनी विशेषतः महाराष्ट्रातील पाचही संप्रदायातील संतांनी प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून समाजाला सुखी जीवनाचा मूलमंत्र दिला. […]
” गहरी चाल ” अशा आकर्षक नावाच्या चित्रपटाने फसवणूक झालेला मी रिकाम्या हातांनी बाहेर पडल्यामुळे चिडलो होतो पण भुसावळच्या वसंत टॉकीज मध्ये “जंजीर” पाहताना दचकून ताठ बसलो – ” ये पुलिस स्टेशन हैं, तुम्हारे बाप का घर नहीं ! ” पडद्यावर प्राणही तितकाच दचकला असावा. आणि आज तो /जया सोडले तर त्या अंगारांचे साक्षीदार (प्राण, इफ्तेकार, ओम प्रकाश, अजीत, प्रकाश मेहरा) निघून गेले आहेत. […]
रामदास व सावरकर या दोघानी लहानपणी बलोपासना केली. समर्थ रामदास रोज बाराशे नमस्कार घालीत तर सावरकर जोर बैठका , पोहणे,धावणे डोंगर चढणे असा व्यायाम करीत. त्यामुळे दोघांचेही शरीर काटक व सोशीक बनले होते. लहानपणी दोघेही देव भक्त होते. मोठेपणी दोघांनाही खरा देव कोणता याची ओळख पटली. […]
कधी कधी आयुष्याच्या धावपळीत अचानक काही निवांत क्षण वाट्याला येतात, ते आपण प्लॅन केलेले नसतात. ते अवचित वाट्याला येतात. एखादे स्वप्न पडावे तसे. आणि आपण त्या जागेपणीच्या स्वप्नात अक्षरश: रंगून जातो. आपण आपली कामे, विवंचना, किंबहुना आपले वयही विसरतो. आपल्यासमोर उभा असतो एखादा निवांत–मोकळा आठवडा. आपण त्याची कधी कल्पना स्वप्नात देखील केलेली नसते. […]
महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत. […]