….. हे शाईचे पेन पहिले की मनाला फार आनंद होतो व असे सुंदर सुंदर पेन पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते. पूर्वी शाळेला होतो तेव्हा टाक दौत बरु अशा वस्तू असायच्या पण पुढे पुढे टाक व दौत जावूनशाईपेन आले. त्यावेळी अनेक कंपन्या पेपर क्विन या नावाचा पेन बाजारात येत होता. तशा अनेक कंपन्या शाईचे पेन विक्रीसाठी काढत […]
मी लहान असताना आमच्या रानात राहायला होतो त्यावेळी रानात गावात सुद्धा लाईट नव्हती. गावात ठराविक ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवलेले रॉकेलचे दिवे होते. रानात तर भयानक अंधार माजलेला असायचा एखाद्यावेळी रातकिडे रात्रीच्यावेळी फिरत होते. या रात किडयाला आजी काजवा असे म्हणत. काजव्याच्या प्रकाशातून थोडे फार शेतीचे दर्शन व्हायचे. परंतु हेकिडे रात्रीच्या अंधारात मला सुंदर असे दिसत होते. आमच्या […]
… मी लहान होतो तेव्हा चांदोबा या पुस्तकाचा अगदी जवळचा वाचक होतो. त्यावेळी वर्तमानपत्रांची संख्या फार कमी होती ठराविक मासिके ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये वाचाव्यास मिळत होते. वाचनालये शहराच्या ठिकाणी होती शिवाय करमणुकीची साधने सुद्धा अतिशय कमी होती. गावामध्ये काही लोकांच्या घरात हरकुलस कंपनीची सायकल असायचे ठराविक लोकांच्या घरात रेडिओ असायचा. ज्याच्या घरामध्ये रेडिओ आहे त्याला गावामध्ये श्रीमंत […]
विदेशी कपड्याची होळी झाल्यावर इंग्रज सरकार खूप संतापले. फर्गसन महाविद्यालयचे प्राचार्य रेन्गलर परांजपे प्रचंड भडकले. होळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी सावरकरांना दहा रुपयांचा दंड केला. पण सावरकरांच्या मित्रांनी निधी उभारला. सावरकरांनी दंड भरला,व उरलेले पैसे “पैसा फंड “ निधीला देऊन टाकला. […]
परळी तालुक्यातील हाळम हे छोटे खेडेगाव आहे. माझे मूळ गाव हाळम आहे. पण लहानपणापासून परळीला राहत होतो. शाळेला सुट्ट्या लागल्या की हाळम गावी जायची खूप ओढ निर्माण व्हायची. सर्व नातेवाईकांमध्ये राहण्याची मजा काही न्यारी असायची. सर्व भावंडं सुट्ट्यांमध्ये एकत्रित यायचे. […]
नुकतेच आम्ही दोन दिवसांसाठी एका रिसोर्टला भेट देऊन आलो आणि आल्या आल्याच त्याने मान टाकली. कळतंय का तुम्हाला??? दोऽऽऽन दिवस त्याच्याशिवाय… माझ्या बायकोने काढले. कसे काढले तिलाच माहित. खूऽऽऽप खूऽऽऽप त्रास होत होता तिला, लक्ष कशा कशात लागत नव्हतं, जीवन असार आहे असं वाटू लागलं होतं. तसा मी(आयुष्याचा साथीदार)आणि आमचा लेक घरातच होतो जवळच तिच्या, म्हणजे […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. नीतिन आरेकर यांनी लिहिलेला हा लेख श्रेष्ठ दर्जाचं साहित्य हे प्रत्येक काळातील वाचकासमोर एक आव्हान असतं. कारण ते कालसापेक्ष असतं आणि तितकंच कालातीतही असतं. ते साहित्य वाचकाच्या कुवतीनुसार त्याला समाधान देत असतं. तो वाचक, त्या साहित्याची, त्याला सापडलेल्या वा त्याला आधारासाठी उपलब्ध असलेल्या निकर्षांच्या आधारावर समीक्षा करत असतो. तुकारामांचं […]
एकेका पदार्थाचा काय महिमा असतो नाही? पुरणपोळी, मोदक, श्रीखंड, बासुंदी, मणगणं…जाऊदे, थांबतो इथेच. विचारानेही त्रास होतो हो उगाच. आता इथे मी मला आवडणारे पदार्थ घेतलेयत. दुसरं कुणी त्याच्या आवडीच्या पदार्थांची यादी सांगेल. व्यक्ती तितक्या प्रकृ… आवडी. प्रत्येक प्रांतातील नागरिकांना तिथल्या परंपरागत पदार्थांचा मनापासून अभिमान असतो, आणि आपल्याकडे आलेल्या परप्रांतातील पाहुण्यांना हे पदार्थ ते आग्रहाने खाऊ घालतात. […]
आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून क्रमिक लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात त्यांच्यासाठी मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो. […]
अण्णांच्याबरोबर पाच नंबरचा भाऊ (चंदू) अंधेरीला रहायला आला. पहिल्या पाच भावात केवळ तोच मॕट्रीक पास झाला. तो नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी त्याच्या एका मित्राला दोन नोकऱ्यांचे कॉल आले. एक रिझर्व्ह बँकेतून आणि एक खाजगी कंपनीमधून. मित्राने रिझर्व्ह बँकेची नोकरी स्वीकारली. दोघांचे आडनांव एकच होते. आद्याक्षरे मित्राची जी.एन. आणि ह्याची सी.एन. होती. त्यांचे कॉल लेटर घेऊन हा खाजगी कंपनीत गेला आणि त्याला ती नोकरी मिळाली. […]