त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. भागवत चौधरी यांनी लिहिलेला हा लेख माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील फुलगाव या छोट्याशा गावी २९/१०/१९५१ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. वडील जेमतेम चौथीपर्यंत शिकलेले तर आईने शाळेचे तोंडच बघितलेले नव्हते. आमच्या गावाजवळ विल्हाळे म्हणून गाव आहे. तिथे तलाव खोदण्याचे काम चालू होते. कारण त्यावर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलेला होता. […]
राजकारण आणि साहित्य ही खरंतर दोन विरुद्ध टोकं असं आपल्याला वाटतं. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर हा दरवर्षी चघळला जाणारा विषय. पण आचार्य अत्रे, ग दि माडगूळकर यासारख्या काही प्रतिथयश साहित्यिकांनी राजकारणातही त्यांची चमक दाखवली आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या काही राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रातही ! सावरकर तर दोन्ही क्षेत्रातले स्टार व्यक्तिमत्त्व. साहित्याची विशेष जाण आणि साहित्यात यशस्वी वाटचाल करणारे […]
या पुरस्काराने कार्यक्रम करण्याची नवी उमेद दिली. कळवा स्कूलच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या शंकर-जयकिशन नाईटमध्ये मी काही गाणी गायली. ओसवाल पार्क कलामंचच्या उद्घाटनाप्रित्यर्थ ‘फर्माईश’ हा माझा गझलचा कार्यक्रम झाला. सौ. पारसनीस आणि श्री. पटवर्धन याचे आयोजक होते. यानंतर ‘स्वर- गंध’ या अंधांसाठी आयोजित केलेल्या सुगम संगीत गायन स्पर्धेचे मी परीक्षण केले. रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्स आणि […]
शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. […]
सूचना – इथे कोणावरही टीका करण्याचा किंवा सल्ला देण्याचा काहीही हेतू नाहीये. त्यावरून प्लिज कोणताही निर्णय घेऊ नये. मीना ची दहावी अर्ध्यात पोहोचली म्हणजे सप्टेंबर/ऑक्टोबर उजाडला आणि तिच्या पालकांच्या मोबाईलवर अचानक क्लासेसचे फोन यायला लागले. आमच्या क्लास ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्या मुलीला द्यायला लावा म्हणजे तिचा आता पर्यंतचा अभ्यास कसा चाललंय तेही कळेल आणि त्या मार्क्सवर […]
१९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता. […]
ओनली थिंग कॉस्टंट इंन धिस वर्ल्ड इज चेंज, असं एक इंग्रजी वचन आहे. जगात कायमस्वरुपी टिकून राहणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल, असा या वचनाचा अर्थ! थोडक्यात जगात कायमस्वरुपी टिकून राहणारं काहीच नसतं, प्रत्येक गोष्ट बदलतच राहते. अवतीभवती कुठेही नजर टाकली की सर्वच गोष्टी कशा बदलतात याचं प्रत्यंतर आपल्याला येतं. काही गोष्टी एवढ्या बदलतात […]
२०१५ हे वर्ष मला बरेच काही द्यायचे असे ठरवून उजाडले. ‘ठाणे नगर विकास मंच’ ही संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना ‘ठाणे नगररत्न’ पुरस्काराने सन्मानित करते. ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष माननीय श्री. सुभाष काळे यांनी फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. “अनिरुद्धजी, कलाक्षेत्रातील या वर्षीच्या ठाणे नगररत्न पुरस्कारासाठी […]
मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला “सगळ्यांचो बापुस” असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही. तुकतुकीत […]