लौकिकदृष्ट्या विजय तेंडुलकरांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी आयुष्य जगण्याच्या महाविद्यालयात त्यांनी अनेक प्रकारचे अलुभव घेतले. हे शिक्षण घेत असताना त्यांना माणसातील माणूसपणांचे आणि त्यांच्यातील पशुत्वाचे दर्शन घडले आणि हेच समाजातील वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. समाजाला नाटकातून असे जळजळीत सत्य बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांची नाटके सतत वादाच्या भोवऱ्यात सापडली. […]
पेंडसे मुळचे कोकणातले असल्या कारणाने त्यांचे कोकणावर नितांत प्रेम, त्यांनी कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल “गारंबीचा बापू7 हे नाटक आणि त्या नाटकातील काशीनाथ घाणेकर यांनी साकारलेली बापूची भूमिका अत्यंत गाजली. केवळ बापूच गाजला नाही तर त्या नाटकातील राधा सुद्धा तेवढीच गाजली, […]
रोजचे वर्तमानपत्र उघडले रे उघडले, की बलात्कार, दरोडे, खून, लफडी, घोटाळे, अब्जावधी-कोट्यवधी बेनामी मालमत्तेचा पोलिसांनी लावलेला शोध, खोट्या चलनी नोटांचे कारखाने या अशा बातम्या वस्सकन अंगावर येतात. संघटित गुन्हेगारी, पोलीस खात्याची बदनामी हे विषय तर वर्तमानपत्रात रतीब घालणारे विषय झाले आहेत. रोज सकाळी वृत्तपत्र वाचून मन विषण्ण होते, सुन्न होते. काही इंग्रजी वृत्तपत्रांत, विशेषत या दैनिकांच्या […]
मनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची […]
मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे. माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था […]
काही गोष्टींना कसा योगच यावा लागतो, तेव्हा त्या घडतात. जसे मुलीचे लग्न. योग आला की चटकन् dजमते नाही तर चपला झिजवून झिजवून वधुपिता कसा रडकुंडीला येत असतो. आमच्या कुंडलीत पण परदेशगमनाचा योग लिहिलेला असावा म्हणूनच मुलगा अन् सून हाँगकाँगला गेल्यावर आम्ही उभयता कॅथे पॅसिफिकच्या विमानाने एका संध्याकाळी हाँगकाँगला येऊन पोहोचलो. बेटसमूहांचा बनलेला हाँगकाँग हा आता चीनच्या […]
ने हमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही. पस्तीस-चाळीस वर्ष. आयुष्याचा केवढा मोठा लांबलचक पल्ला. […]