सप्रेम नमस्कार ! मंडळी आपल्या शरीरात पाच प्राण वसत असतात ज्यांच्या जागृतावस्थेयोगे आपण जीवन जगंत असतो आणि हे पंचप्राण म्हणजे अपान , व्यान , उदान , समान आणि ब्रह्मण आज मी तुम्हाला या पंचप्राणांमधेहि जो एक प्रमुख असतो , अशा एका पंचप्राणांच्या प्राणा विषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. […]
आपल्यातील सगळेजणच Wish you best of luck, Happy Journy वगैरे म्हणत असतात. फुलांचे गुच्छ हातात देत असतात. एकटी आई मात्र एकच वाक्य उच्चारते, ‘गेल्यावर पत्र टाक रे बाबा! ” कसल्याही शुभेच्छा व्यक्त न केलेल्या त्या वाक्यामध्ये सगळ्या शुभेच्छांचा वर्षाव जाणवतो. औपचारिकतेची सगळी फुलं तेव्हा मलूल वाटायला लागतात. […]
गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या चित्तसागराला आनंदाची भरती आणणारा महोत्सव आहे. गणेशोत्सवात मराठी माणूस शरीराने आणि मनानेही रंगून जातो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही गल्लीबोळात गणेशोत्सवाच्या १० दिवसांत उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. […]
अध्यात्म ‘ मोक्षप्राप्तीच्या मार्गातली धोंड म्हणून तिचा उल्लेख करतं, पुरुषाच्या ध्येयप्राप्तीमध्ये स्त्री ही अडथळा आणते कारण तिला पुरुष हवा असतो तो ऐहिकसुखात कालक्रमण करण्यासाठी, असं काही सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. पण हे कितपत खरंय? उलट त्याग, समर्पण आणि ज्याच्याबरोबर सात पावलं चालली त्याला त्याच्या सगळ्या मार्गावर आजन्म साथ देण्याची तयारी यासाठीच तर भारतीय स्त्रिया प्रसिद्ध आहेत. […]
चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही. […]
बीपीटी कॉलनीतील चाळीवजा बिल्डिंग मध्ये लहान खोल्यांमध्ये मागील वर्षापर्यंत गणेशोत्सव साजरा करणारे राघव काका आणि त्यांचा पुतण्या विजय, यावर्षी दोघेच जण भायखळ्याहुन गणपतीची मुर्ती न्यायला आले होते. राघव काकांनी वीस वर्षांपुर्वी घरात दीड दिवसांचा गणपती आणायला सुरुवात केली होती. तेव्हापासून बीपीटी कॉलनीत त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ आणि लहान भाऊ सह कुटुंब दोन दिवसांसाठी येऊन राहत होते. […]
जीवन म्हणजे जशी कटकटीची मालिकाच होय.अडचणी, अडथळे पार करतच मार्गक्रमण करावे लागते.कोणतेही कार्य सुरळीत पार पडत नाही.सततची परवड हतबल करते.सहज सोपे वाटणारे काम देखील अडथळ्यांविना पूर्ण होत नाही. […]
महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या अंदाजे १८ टक्के मराठी माणूस हा बृहन्महाराष्ट्रात वास्तव्यास असतो. मराठ्यांच्या साम्राज्याला टिकविण्यासाठी आणि एकेकाळी त्यांचा झेंडा अटकेपार फडकविण्यासाठी, निमूटपणे मराठ्यांच्या सैन्याबरोबर बृहन्महाराष्ट्रात गेलेला हा मराठी माणूस गेल्या २५० पेक्षा जास्त वर्षांपासून त्या त्या प्रांतात आपापल्यापरीने स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेत आनंदी आहे. […]