खाद्या प्रसंग माणसाला बरेच काही शिकवून जातो. पण आठवण मात्र कायम राहते. आणि एक धडा शिकायला मिळतो. माझ्या बाबतीतही असेच झाले आहे. मुलं लहान असताना दरवर्षी पास झाले की पेढे आणून देवापुढे ठेवून मग सगळ्यांना वाटत होते आणि त्यांचे कौतुक करत होते. […]
कोकण म्हणजे एक अंगठी मानली तर त्यात कोकम म्हणजे माणिक, पाचू म्हणजे हिरवागार निसर्ग आणि नारळ म्हणजे गोमेद अशी तीन रत्न त्यावर जडली आहेत असं म्हणायला हरकत नाही. आहे त्यात भागवण्यापेक्षा जे आहे त्यात साजरं कसं करता येईल असा स्वभाव असणाऱ्या कोकणी माणसाकडे आदरातिथ्य यथायोग्य होतंच. […]
बाईपण म्हणजे काय हे बाईला समजले पाहिजे. पुरुषांना आपला पुरुषार्थ गाजवावा लागतो. अगदी तसेच बाईला बाईपण निभावून न्यायला लागते. म्हणजे किमान नम्रता. शालीनता. चारित्र्य. त्याग.संयम.सुगरण.स्वच्छता टापटीप. अशा अनेक गोष्टी असतात. शिवाय माया प्रेम आपुलकी. बांधिलकी निष्ठा यादी खूप मोठी आहे आणि हे सगळे अगदी काटेकोरपणे पाळणे शक्य नसेल तर किमान थोडे बहुत असणे आवश्यक आहे नव्हे […]
टॅक्सीत बसल्यावर त्यांचा संवाद कोणत्या तऱ्हेचा असे हे चौकशीअंती कळल्यावर एक अनुमान काढता आले की आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखणारे होते. लुटीनंतर टॅक्सी जिथे सोडून दिली जात होती तिथपासून घरापर्यंतचे अंतर चालत जाण्याइतपत किंवा तेथून दुसरी टॅक्सी केली तरी कमीत कमी मीटर रिडिंग होईल इतक्या अंतरावर आरोपींची निवास स्थाने असावीत असाही आमचा होरा होता. […]
खरं पाहता मुंबई ही काम करणाऱ्याची आईच आहे. कारण मुंबई कधीच कुणाला नाराज करत नाही. देशभरातून लोक इथे येतात आणि पैसे कमावतात. आता तर मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे येथे ग्राहकही खूप आहेत. अगदी 20 – 25 वर्षांपूर्वी जिथे कमी लोकसंख्या होती, तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत. कोरोनाकाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर नोकरी गेल्यामुळे त्रासलेल्या लोकांना नव-रोजगार सुद्धा मिळालेला आहे. […]
गजेंद्र अहिरे हा माणूस आरपार क्लिष्ट आहे. भावनांचे जंगल तयार करायचे, त्यांत प्रेक्षकांना सोडायचे आणि हळूच हातातून हात काढून घ्यायचा. मग तुम्ही वल्हवत बसा होडी- नशिबी असेल तर मिळेल किनारा अन्यथा आहेच चारही बाजूला पाणी- नाकातोंडात जाऊन गुदमरायला लावणारे. […]
माझ्याप्रमाणे, माझ्यासारख्या लाखो वाचकांच्या मनावर अजूनही राज्य करणारे शब्दप्रभू. स्वर्गीय लेखक , साहित्य गंगेच्या प्रवाहात वाचकांना न्हाऊ घालणारे शब्दशिरोमणी. […]
इलाहाबाद चा अमिताभ गंगा किनाऱ्यावरील छोरा म्हणून स्वतःची टिमकी वाजवतो. काल त्याला भुसावळच्या नितीनने बरौनीच्या गंगाकिनारी जाऊन आव्हान दिले. बिहारच्या आदरातिथ्याच्या शेवटच्या टप्प्यात कलकत्त्याच्या संदीप, भुसावळच्या नितीनला घेऊन गेला पुरातन सीमारीया घाटावरील मंदिरात ! रात्रीचे भजन-कीर्तन आणि प्रसाद वाटप झाल्यावर तिथल्या महंतांनी विचारले- ” कौन गाँव देवता ? ” […]
एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत. […]
जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा … […]