त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सुर्य क्षितिजावर अस्तास जात असतांना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनीचा मालक झाल. पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन तो धापा टाकून कोसळला व मृत्युमुखी पडला. […]
न्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. […]
प्रतिपदेच्या चंद्र कलेप्रमाणे विकसित होत जाणारी हि राजा ….तुझी मुद्रा . हि जगाला वंज हो . जगाला कल्याणकारी ठरो असा ह्या मुद्रेचा आक्षय म्हणजेच ( अर्थ ) होता आणि आहे आपल्याराजमुद्रेचा
दिवाळीमध्ये सगळीकडे आनंदाचे, उत्साहाचे वातावरण पाहताच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. लहानपणी या दिवसांमध्ये रात्री चांदण्यांनी खच्च भरलेले आभाळ पहायला मिळायचे. दिवाळी खर्या अर्थाने साजरी करायची असेल तर इतरांचे आयुष्य उजळवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. दिवाळी हा सामाजिक उत्सव नसून तो कौटुंबिक सण आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा आनंद लुटतो. […]
आज आपल्यासमोर दहशतवाद, पाकिस्तान आणि चीनबरोबरील सीमाप्रश्न,चीनचा पाण्याचा प्रश्न, भारतातील बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न, श्रीलंकेतील लिट्टेंचा प्रश्न असे अनेक देशांत असलेले परंतू त्यावर तातडीची भुमिका घ्यायला लावणारे अनेक प्रश्न आहेत. […]
दिवाळीसाठी विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर तयार मिठाईला मागणी असते. शिवाय गोडधोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. साहजिकच दूध, दही, चक्का, खवा यालाही मोठी मागणी असते. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत बाजारात भेसळयुक्त खवा बाजारात आणला जात आहे. राज्यात आतापर्यंत भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे यावेळी दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाताना जरा विचारच करायला हवा. […]
आशिया खंड सोडल्यास इतर खंडांमधील देश आपापसातील वैर विसरून एकमेकांशी सहकार्याच्या तत्वाने एकत्र मिळून प्रगतीची वाटचाल करत आहेत. परंतू आशिया खंडात हे चित्र दृष्टोत्पत्तीस पडत नाही. इतर खंडातील देशांनी एकमेकांत वैर असण्याचे नुकसान-तोटे भोगलेले आहेत. पण आशिया खंडातील देश या दृष्टीने अजुनही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. पुढच्यास ठेस मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ येथे लक्षात घेण्याची खरोखर गरज आहे. स्वार्थ विसरून आणि एकमेकांच्या फायद्याच्या गोष्टींत समसमान रस घेउन एकत्र प्रगती करणे शक्य आहे. आशिया खंडातील अशाच गंभीर प्रश्नांवर कशाप्रकारे यशस्वीपणाने तोडगा काढला जाउ शकतो यावर संदीप वासलेकरांच्या एका दिशेचा शोध या पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे. […]
स्वातंत्र्यापासूनच भारत आणि अमेरिकेतील संबंधांमध्ये अनेक उतार-चढाव आले; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या दोन महासत्ता राजकीयदृष्ट्या अधिक जवळ आल्याने जागतिक राजकारणाची समीकरणे बदलली. ओबामांच्या भारतभेटीमुळे हे संबंध दृढ होऊन भारताच्या आण्विक कार्यक्रमाला अमेरिकेची मदत मिळेल तसेच भारतावरील निर्बंध मागे घेतले जातील अशी आशा आहे. […]
पोलिओ मुलांना अपंग तर करतोच पण प्रसंगी त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. या व्याधीविरुद्ध भारतासह जगभर सुरू असलेल्या लढ्याला यश मिळत आहे. असे असूनही आपल्यासमोरील आव्हान संपलेले नाही. त्यामुळे पोलिओच्या निराकरणासाठी देशवासीयांनी या मोहिमेत खारीचा वाटा उचलायला हवा. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी युनेस्कोचे ‘गुडविल अॅम्बॅसिडर’ म्हणून बोलताना मांडलेल्या विचारांचे संकलन. […]