श्रावण आला की मला आमच्या लहानपणीच्या अनेक गमतीशीर आठवणी नजरसमोर येतात. त्यातीलच एक म्हणजे श्रावणी. आता तो काळ गेला. मुळात किती लोक जानवे घालतात हाच संशोधनाचा विषय. श्रावणी करणारेही कुणी आढळत नाही. आताच्या पिढीतील मुलांच्या आनंद मिळवण्याच्या विविध गोष्टी बघीतल्या तर आमचे आनंद मिळवण्याचे मार्ग किती साधे आणी सोपे होते हे पाहून आजही मन आनंदाने भरून जाते. […]
समस्त जीवांस अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी, शके १८००, सन १८७८ ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वीतला वरून गुप्त झाली. […]
आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे. […]
२१ फेब्रुवारी हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन ‘ म्हणून पाळला जातो. बांगला देशी विद्यार्थ्यांनी उर्दूसोबत बांग्ला भाषेलाही राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून १९५२ साली निदर्शने केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस युनोस्को तर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. भाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. आपली भाषा ही […]
सामाजिक सांस्कृतिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मैलाचा दगड बनलेले गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ साली इंदूर येथे झाला. हे नाटक रंगमंचावर आले आणि त्याने इतिहास घडवला. बालिका-जारठ विवाहांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समस्येला वाचा फुटली. या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या […]
कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला. घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत […]
मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र उर्फ किशोर कदम यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष […]
किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी झाला. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होऊच शकणार नाही. १९६० च्याल दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्याव दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही […]
पण खरोखरीच आज तात्यांना पाहून खुप आनंद झाला….
आज रिटायरमेंट नंतर कसे होईल या विचारांनी डिप्रेस झालेले अनेक लोक दिसतात… घरी बसल्या बसल्या…घरच्या मंडळींना वैताग देत असतात….! […]