शेतकर्यांना शेतीपासून बेदखल करणारे, त्यांच्या जगण्याचा साकल्याने विचार न करणारे धोरण देशाचे मुळ हादरवू शकते. ‘सेझ’सारख्या प्रकल्पांसाठी जमिनी सक्तीने संकलीत केली जाणे, नैसर्गिक संसाधन विधेयक कायद्याची पायमल्ली करणे आणि शेतीबाह्य व्यवसायांकडे वळण्याचा आग्रह यामुळे नवे संकट उभे राहत आहे. […]
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या घुसखोरीमुळे बाभळी धरणाच्या वादाला पुन्हा तोंड फुटले. कोणतेही कारण नसताना हा प्रश्न उकरून काढणे चुकीचे आहे. पण, केवळ राजकीय स्वार्थापोटी नायडूंनी हा नसता उद्योग केला. या प्रश्नाबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकार कुचकामी असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. आता या प्रश्नावर राज्यातील जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. […]
‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते. […]
ओमान देशाला आखाती राष्ट्रसमूहाचे प्रवेशद्वार म्हटले आहे तर वावगे ठरू नये. तीन समुद्रांची किनार व निसर्गाचे लेणे लाभलेला हा देश पर्यटकांना आकर्षित तर करतोच परंतु गेल्या अवघ्या चार दशकांत व्यापार उदिमात झपाट्याने अग्रेसर बनून सर्वांगीण प्रगतीची कास धरणारे राष्ट्र म्हणून हा देश मला विशेष भावला. प्रस्तुत लेखात मस्कत-सूर आदी ओमान देशातील ठिकाणी केलेल्या शैक्षणिक दौर्यातील अनुभव लिहिलेले आहेत. […]
काश्मिरात आगीशी खेळ नेहरूंनी केलेली चूक भारताला ६० वर्षा नंतर ही भोवते , महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, शिक्षण वाद , राजस्थान मधील जाट – गुज्जर -दलित जात प्रश्न सतत पेटवला जात आहे, आंध्रात कारण नसताना तेलंगणाचा वाद उरकून काढून आग लावली ती भडकली तेंव्हा करोडो रुपयाची मालमत्ता भस्मसात झाली […]
भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर सट्टेबाज काळाबाजार करणारे मोठे व्यापारी उद्योजक यांचे नियंत्रण आहे आणि पक्ष चालवण्यासाठी लागणारा प्रचंड काळा पैसा कांही सामान्य नागरिक किंवा शेतकरी देवू शकत नाही. […]