मर्ढेकरांची “आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ;” ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. परंतु कवितेतील हा पाउस वेगळाच आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँबचा संदर्भ आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी याशहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी असा हा पाऊस आहे. […]
पंजाबमधील पोलीस महासंचालक शशिकांत यांनी, कारागृहातील गुन्हेगारांना शारीरिक सुख (वैवाहिक जीवनातील) मिळवून देण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली.अश्या प्रकारची परवानगी मिळाल्यावर, दृष्ट कसाबही त्याच्या बायकोला वा प्रीयेसीला कारागृहात आणण्याची परवानगी मागेल, आम्ही ती देणार काय ? आतंकवादी कारवाया केल्यावरही, भारतीय कारागृहात बायकोसोबत सुख उपभोगता येते, असे समजल्यावर सीमेपलीकडील आतंकवाद्यांना तर, अपार आनंदच होईल. […]
मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते. […]
आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात. […]
पृथ्वी ही चमत्कारांची जननी आहे. जसे असंख्य चमत्कार पृथ्वीच्या गर्भात, व मानवव्यापित पृष्ठभागावर घडत असतात, त्याचप्रमाणे आपल्या वर अमर्याद पसरलेल्या अवकाशातसुध्दा असे आश्चर्यात टाकणारे, डोळे दिपविणारे तर काही वेळा अनेक रहस्यांचा उलगडा करणारे हजारो चमत्कार घडत असतात. हे चमत्कार बर्याच वेळेला पुर्वकथित असतात, अटळ असतात व विश्वाच्या नियमांनुसार ते घडत असतात. […]
जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे.
सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित … […]