इतर सर्व
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
आण्णाचा विजय…….लोकशाहीचा विजय……!!!!!
अखेर अहिंसाच्या मार्गाने आण्णांनी भ्रष्टाचारा विरुद्धची पहिली लढाई जिंकली. ४५ वर्षानंतर लोकपाल विधेयकावर संसदेत एकमत झाले ही एक ऐतिहासिक घटना होय.
[…]
बोनस
एकदा लंच पिरीयड मध्ये जेवणाचे डबे उघडून आम्ही सारे सहकारी जेवणाचा आनंद घेत होतो. अर्थात जेवणापेक्षा महत्वाच्या गप्पा. कुणाला तरी लॉटरी लागली होती त्याची माहिती कुणी सांगत होते. जयेश अमिन हा ग्रीनकार्ड धारक ब्रॅंचमधे अनेक वर्षे होता. तो अमेरिकेत येऊनही बरीच वर्षे झाली होती. न्यू यॉर्क शाखेतील स्टाफने एकदा सर्वात मिळून घेतलेल्या तिकिटाला किती पैसे मिळाले होते त्याचे त्याने वर्णन केले. पुन्हा एकदा तिकिट घ्यायचे चालले होते.
[…]
दिल्लीतील मराठी पाऊलखुणा
दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधाचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर १७०७ सालापासून १८०३ सालापर्यंतचा सलग कालखंड डोळयासमोर येतो. शहेनशहा औरंगजेबच्या मुत्युनंतर येसूबाई व इतर २०० जण दिल्लीत डेरेदाखल झाले आणि हेच दिल्लीचे पहिले मराठी निवासी होत. १७०८ ते १७६९ या काळातील अंतोजी माणकेश्वर, महादेव हिंगणे, महादजी अशा चतुर, मुत्सद्दी सरदारांनी पेशव्यांच्यावतीने दिल्लीत अंमल केला. मराठी वकिलातीचे हे पहिले पाऊल म्हणावयास हरकत नाही.
[…]
गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ…!!!
” गुडूची कटुका तिक्ता स्वादुपाका रसायनी |
संग्रहिणी कषायोष्णा लध्वी बल्याग्नि दीपनी ||
दोषज्यामतृडदाहमेहकासाश्च पाण्डूताम |
कामला कुष्ठवातास्रज्वरकृमीवमीर्हरेत ||”
-(भाव प्रकाश )
गुळवेल ह्या वनस्पतीला भारतीय उपचार पद्धती तथा आयुर्वेदात फार महत्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे,जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती सहजतेने जीवंत असते.
रासायनिक घटक- ग्लुकोसीन, जीलोईन, १.२ टक्के स्टार्च, बर्वेरीन, ग्लुकोसाईड, गिलोइमिन, कैसमेंथीन, पामारीन, रीनात्पेरीन, टीनास्पोरिक, उडनशील तेल, वसा, अल्कोहोल, ग्लीस्टोराल इत्यादी घटक आढळतात.
एवढे महत्वपूर्ण घटक असलेल्या या वनस्पतीमध्ये ‘मायक्रोबैक्टेरीयम ट्युबरकुलौसिस’ (Tuber Culosis), ‘एस्केनीशिया कोलाई’ या आतडे आणि मूत्रसंस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगाणु ला नष्ट करते, तसेच विषाणू समुह व कृमी आदी नष्ट करण्याची क्षमता या दिव्या वनस्पतीमध्ये आहे. […]
मा की दाल/ साबूत उडीदाची डाळ
(उडीद डाळ- पारंपारिक मसाले वापरून, कमी तेलात व कमी वेळात कशी करायची).
[…]
लोकशाहीत सरकार निरंकुश कशी काय राहू शकते ?
लोकशाहीत कोणतीही सरकार निरंकुश असूच शकत नाही.लोकशाहीत जनता सर्व शक्तिमान असून सत्ताधारी जनतेचे नोकर आहेत. जो विनावेतन व आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवून जनसेवा करत असेल, त्यालाच जनतेचा नेता म्हणता येऊ शकते ! अन्यथा सर्व नोकर आहेत. संसदेला विशेषाधिकार असले तरी जनतेपेक्षा जास्त नाहीत, हे कसे विसरता येईल ? सत्तेच्या नशेत काहीही वक्तव्य करणे कायदेशीर आहे काय ? सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा निरंकुश बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले, हा इतिहास सांगण्याची गरज नाही.
[…]
येथे तिरंगा विकला जातो
नेटवरुन येणारे अनेक फॉरवर्डस कोण लिहितं, कुठून येतात माहित नाही. मात्र ते इतके छान असतात की त्यांना इतरांपर्यंत पोहोचवण्याचा मोह आवरत नाही.
[…]