“आज भारतात ’धर्मनिरपेक्षवाद’ नावाचा अजून एक धर्म अस्तित्वात आला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्यूलरिझम. पण सेक्यूलर हा शब्द अर्थहीन आहे. कारण एक राज्य सेक्यूलर असू शकतं. पण एक व्यक्ती नाही. एक व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिवादी किंवा नास्तिक असू शकते पण सेक्यूलर नाही. जर कुणी स्वताला सेक्यूलर म्हणवून घेत असेल तर ती एक विकृती आहे.”
हे खडे बोल आहेत, हिंदू वॉइसचे संपादक पी दैवमुथु यांचे. […]
आण्णा हजारे समाजसेवक यांनी आमरण उपोषण ” भ्रष्टाचार निर्मुलन ” साठी जंतर-मंतर दिल्लीत केले व संपूर्ण भारतातून त्यांच्या ह्या उपक्रमास भरघोस पाठींबा मिळाला . जो अलोट पाठींबा जनतेच्या सर्व थरातून मिळला त्यांत तरुणाचा मोठ्या संख्येने सहभाग व तसेंच समाजाच्या सर्वच थरातून या जन लोकपाल बिलास मिळालेले प्रतिसाद तसेंच मिडिया व ईतर मान्यवरानी ठीक ठिकाणी केलेले आंदोलन व उपोषण ह्या रेट्या मुळेच सरकारनी नमते घेत ” ड्राफ्ट कमेटी ” ची स्थापना व त्यांत समाजसेवक प्रतिनिधी घेण्यावर राजी झाले . […]
शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम. […]