नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

दुर्दैवी दुखणे

सोनियाजी व शरदराव त्यांच्या दुखण्याच्या इलाजासाठी वारंवार परदेश गमन करून करदात्यांचा पैसा उधळतात. हो उधळणे असा शब्द मी वापरला आहे, कदाचित त्यांचे दुखणे पाहून हा शब्द, असहिष्णू असाच वाटेल; नाही तो आहेच हे माझे हि ठाम मत आहे, कदाचित लोकांचा रोष ओढवून घेण्यासाठीच मी हा शब्द वापरत आहे असे त्यांच्या भक्तांनी समजावे. आपल्या देशात साठ वर्षातील […]

सत्कार – नगरसेवकांचा की नागरिकांचा

नुकत्याच महाराष्ट्रात काही मोठ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या वेळच्या निवडणूका काहीश्या अटीतटीच्या वातावरणातच झाल्या. सख्ख्या चुलत समजल्या जाणाऱ्या ‘दोन भावां’मधल्या या निवडणूकांकडे त्या भावांसकट सर्वांचेच लक्ष होते. त्यातून लागलेल्या निकालाने ते दोनही भाऊ आश्चर्यचकीत झालेले आहेत असाही निश्कर्ष काढता येईल. मात्र दोघांची मती सारखीच गुंग झालेली असली तरी एकाची अपेक्षाभंगाने […]

‘जात’ म्हणजे काय?

जात हा शब्द, संस्कृत जन..जा..म्हणजे जन्म घेणे या क्रियापदापासून आलेला आहे. त्यापासूनच. जन, जनता, जनक, जननी, पूर्वज, वंशज वगैरे शब्द आलेले आहेत. […]

आयुष्याच्या निर्मितीचा रंग कोणता? ‘पांडु’रंग, ‘पांडुरंग’..

आयुष्य निर्मितीचा खरा ‘रंग’ ‘काळ्या’तून जन्मलेला ‘पांढरा’ व पुन्हा ‘काळा’ हे मनोमन पटलं, आणि ‘पांडुरंगा’चा अर्थही पटतो..! ‘काळ्या’ विठ्ठलाला अन्यथा ‘पांडूरंग’ असं विजोड नांव का बरं दिलं असावं..!! […]

शिक्षित अडाणी

युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर एक भाजी विक्रेता फुटपाथवर जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या विकायला बसतो. भाजी घेणाऱ्यांची तोबा गर्दी असते, साधारण वाडीकडे जाणारे सर्व लोक यांच्याकडूनच भाजी घेतात, याचे प्रमुख कारण भाजी बाजारभावापेक्षा स्वस्त असते. सर्व दुचाकी व तुरळक चारचाकी पण इथे थांबून भाजी घेऊन पुढे जातात, हा विक्रेता भाजी घेणाऱ्या प्रत्येकाला एका भाजीला एक प्लास्टिक पिशवी देतो, […]

बालविवाह ; विकासातील अडथळा

बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य […]

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची आवश्यकता

मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम […]

पेढे घ्या पेढे

गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची […]

एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!!

मतदार, मतपेटी आणि आपली लोकशाही; एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!! जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची मानली जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात ही लोकशाही जिवंत आहे. ती जिवंत राहीली याचं कौतुक एवढ्यासाठीच, की स्वात्त्र्यापूर्वी १५० वर्ष या देशावर ब्रिटीशांच राज्य होतं. ब्रिटीश येण्यापूर्वी आपला देश असंख्य छोटी छोटी संस्थानं, राज्य आणि विविध शाह्यांमधे वाटला गेला होता. एकाच […]

निर्लज्ज

भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली… आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली… माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली…. लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची…! त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं… आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला […]

1 104 105 106 107 108 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..