नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

‘मराठी भाषा दिना’च्या निमित्ताने

आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..! […]

मला भेंटलेला रिक्शावाला व त्याच्या नजरेतून मुसलमान समाज

मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं. बाकी त्यांचे सर्व दुर्गूण सोडले तर ही माणसं अनुभवाने […]

एक आवाहन डोळसपणाचं..

गेले काही दिवस चाललेल्या लोकशाहीच्या महोत्सवाची उद्या सांगता होणार. कोणत्याही उत्सवाची सांगता जशी गोड होते, तशीच परवा महाप्रसादाच्या दिवशी एकमेंकांवर केलेले भले-बुरे आरोप प्रत्यारोप विसरून पुन्हा सर्व एकत्र येणार आणि एकमेकाला पावन करून घेणार आणि पुढची पांच वर्ष xxxx पण एकत्र नांदणार. या सर्व पार्श्वभुमीवर सर्वपक्षीयांनी एकमेकांवर केलेले गंभीर आरोप, मतदारांनी आपल्याच पक्षाला मत द्यावं म्हणून […]

पाल, माणूस व महापुरुषांची वाटणी..

“छिपकलीयों का हुनर तो देखो, बड़ी होशियारी से रात के अँधेरे में मोटे मोटे कीड़ो को हज़म कर लेती है, और.. सुबह होते ही अपने गुनाहों को छिपाने के लिए किसी महापुरुष की तस्वीर के पीछे छिप जाती है..” कधीतरी, कुठेतरी वाचलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं हिन्दीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींची साम्य […]

देहदान हाही अेक अंत्यसंस्कारच

कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाॅटॉमी विभागाला, वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करणे हाही अेक अंत्यसंस्कारच आहे या विषयी या लेखात चर्चा केली आहे. […]

प्रजासत्ताक दीन, दिन व दीन..

सोबतचा लेख कृपया लक्षपूर्वक वाचावा ही विनंती, मग प्रतिक्रीया नाही दिल्यात तरी चालेल.. १५ आॅगस्ट १९४७ला देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला आणि १९५० सालच्या आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू होऊन देश सार्वभोम झाला. स्वतंत्र झाल्यापासून घटनेचा अंमल सुरू होईपर्यंत भारताला ‘स्वतंत्र वसाहती’चा दर्जा होता, ‘स्वतंत्र देशा’चा नाही.. आज भारतीय प्रजासत्ताक स्थापन होऊन ६७ वर्ष झाली. […]

महाविद्यालयीन युवतींचे शिक्षण; वास्तव अन् अपेक्षा

गावखेड्यातील मुलं शाळेत येतात. शिक्षण घेतात. तसेच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. मात्र ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या सोयी अत्यल्प असतात. घरची परिस्थिती नाजूक असते. कृषी संस्कृतीशी निगडित व्यवसाय असतो. घरचे संस्कार त्यांच्यासोबत असतात. गावचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर असतो. शिक्षण ही संकल्पना जसजशी प्रगल्भ होऊ पाहते, तितकीच ती कठीण […]

हरलाय महाराष्ट्र… आणि हरलाय मराठी माणूस…

कोणी म्हणतोय भाजप जिंकला, कोणी म्हणतोय शिवसेना हरली, कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर, कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे, कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली… पण लक्षात ठेवा इथे फक्त  “जिंकलाय” आणि पुढे गेलाय तो… गुजराथी, मारवाडी, भैया, मद्रासी, सिंधी, पंजाबी, आणि हरलाय आणि तो फक्त माझा “महाराष्ट्र”… आणि माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”… आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल … महाराष्ट्रात राहून जर […]

आणि आम्ही काय पाहतोय तर, सैराट…!!!

विश्वास नांगरे पाटील म्हणतात, परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , “मागच्या आठवड्यात त्याला […]

किळस आलीय आम्हाला तुमची..

भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय.. असं होतंय याचं कारण यांना ‘लोकसेवा’ करायची नसून काहीही करून सत्ता व त्या सत्तेतून आपल्या पुढल्या कितीतरी पिढ्यांसाठी प्रचंड माया जमवायचीय हे सर्वांनाच कळून चुकलंय आता (तुमच्या पुढच्या पिढ्या […]

1 105 106 107 108 109 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..