केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. मन की बात.. ‘टॅक्सीवाल्याची शिकवण’ ही माझा लेख ‘दैनिक सकाळ’, पुणे व नगर आवृत्तीत ‘मुक्तपिठ’या सदरात नुकताच प्रसिद्ध […]
पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल. आपले नशीब फार चांगले […]
मागील काही दिवसापासुन म्हणजे 8/11/16 तारखेपासून काळा पैसा कसा तयार होतो, कोण साठवतो यावर बरीच चर्चा टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअँप वर दिसून आली, मीही त्यातलाच एक म्हणून जमेल तसे दोन लेख लिहिले. विरोधी पक्षनेते, तसेच NDA मधील काही विरोधी नेते प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच सांगतात, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध आहोत, परंतु ज्या तर्हेने हे सर्व हाताळले जातंय ते बरोबर […]
बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली. एका साध्या टॅक्सीवाल्याने मला दोन गोष्टी अगदी सहजपणे आणि त्याच्याही नकळत शिकवल्या. त्या सांगताना त्याने कुठेही मोठा आव आणला नव्हता मात्र […]
मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही. आता जिथे बोलणंच नाही, तिथे भांडणं कशाला होणार? पण तरीही अधे-मधे भांडणाचे प्रसंग येतात. कारण असतं ते चढता-उतरताना धक्का लागण्याचं. […]
नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे. या निर्णयाचे जे काही भले बुरे परिणाम होतील ते येत्या काही काळात कळतीलंच परंतू तो पर्यंत देश खडबडून जागा झाला हे काय कमी आहे? या एका […]
१५ नोव्हेंबर, २०१६. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघून सातारा–कोरेगाव– खटाव–वडूज अशी मजल दरमजल करीत चार तासांच्या प्रवासानंतर ‘कलेढोण’ नावाच्या खटाव तालुक्यातील एका छोटयाशा गावात माझ्या ‘स्वयंसिध्द शेतकरी’ या कार्यशाळेसाठी दाखल झालो. प्रवासादरम्यान शेतकऱ्यांना भेटणे व त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे या जुन्या सवयीमुळे सभोवतालच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना शोधण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली आणि नेहमीपेक्षा आजचा […]