मुंबईच्या लोकल ट्रेनमधला फर्स्ट क्लासचा डब्बा हे विशेष प्रकरण आहे. इथे सर्वजण आपापला सेंट (परफ्युम हो) आणि आब राखून असतात..जरा कोणाशी बोललो तर आपल्या इभ्रतीचं काय होईल या भयंकर काळजीने इथे एकमेकांशी फारसं कोणी बोलतही नाही. आता जिथे बोलणंच नाही, तिथे भांडणं कशाला होणार? पण तरीही अधे-मधे भांडणाचे प्रसंग येतात. कारण असतं ते चढता-उतरताना धक्का लागण्याचं. […]
नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे. या निर्णयाचे जे काही भले बुरे परिणाम होतील ते येत्या काही काळात कळतीलंच परंतू तो पर्यंत देश खडबडून जागा झाला हे काय कमी आहे? या एका […]
१५ नोव्हेंबर, २०१६. पुण्याहून सकाळी ६ वाजता निघून सातारा–कोरेगाव– खटाव–वडूज अशी मजल दरमजल करीत चार तासांच्या प्रवासानंतर ‘कलेढोण’ नावाच्या खटाव तालुक्यातील एका छोटयाशा गावात माझ्या ‘स्वयंसिध्द शेतकरी’ या कार्यशाळेसाठी दाखल झालो. प्रवासादरम्यान शेतकऱ्यांना भेटणे व त्यांच्या समस्या समजावून घेण्यासाठी त्यांच्याशी गप्पा मारणे या जुन्या सवयीमुळे सभोवतालच्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना शोधण्यासाठी माझी नजर भिरभिरू लागली आणि नेहमीपेक्षा आजचा […]
काही सरकारी बाबू आणि बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा नोटा बदलण्याचा व्यवहार पंतप्रधानांच्या अंगलट कसा येईल हाच प्रयत्न करीत आहेत.त्यांचे प्रयत्न हाणून पाडा. आणखी काही दिवसात प्रचंड काळे पैसे मातीमोल होणार आहेत.देशातल्या प्रत्येक नागरिकाने स्वतः नरेंद्र मोदी आहोत असे समजले पाहिजे.मोदींना कोट्यवधी हातांचे बळ दिले पाहिजे. […]
तो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले. किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे. […]
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा भारतातील बहुतेकांसाठी धक्कादायक ठरला. अतिरेकी कारवाया करणारे आणि अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे. मोदी यांचे सरकार सर्व निर्णय देशाच्या उन्नती साठीच घेत आहेत यावर सध्यातरी ठाम विश्वास ठेवून जनता आहे. पंतप्रधानांचा हेतू प्रामाणिक आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.फक्त त्यांना चांगल्या लोकांची साथ मिळाली पाहिजे. पुढील सर्व धक्के सुखद असतील असे मला वाटते. धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही. […]
मराठय़ांचे मूक मोर्चे निघू लागल्यापासून नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्याला पुष्टी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे उत्तर खणखणीत आहे, ‘केवळ ब्राह्मण असल्याच्या कारणावरून मला दूर केले जाणार नाही. काही चुका झाल्या तरच बदल होईल; अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ मी पूर्ण करेन.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतकेच बोलून थांबलेले नाहीत. ‘मंत्री नेमण्याचा आणि मंत्र्याला काढण्याचा अधिकार […]
दहशतवादी कुठल्याही विशिष्ट आकाराने, वेषाने समोर येत नसतो. दहशतवाद्यांनी स्वत:चे लष्कर, नौदल वा वायुदल उभारलेले ऐकिवात नाही. त्यांचे गट अनेक देशांत अनेक हितसंबंधीच्या मदतीने काम करत असतात. त्यांची अशी लिखित/अलिखित घटना नाही. विचारसरणी नाही. अशा सर्वव्यापी, म्हटल्या तर अदृश्य, म्हटल्या तर दृश्य शक्तीच्या विरोधात काही देशांनी जागतिक युद्ध पुकारले आहे. दहशतवादी गटांबरोबर चर्चा, वाटाघाटी, करार शक्यच […]