आपल्यापैकी प्रत्येकजण उपजिविकेसाठी काही ना काही उद्योग-धंदा करतो.. आपल्यालाही कशाची न कशाची तरी आवड असते..मात्र आपला व्यवसाय व आपली आवड यांचा ताळमेळ कधीच बसत नाही..आवड आणि व्यवसाय यांची सांगड बसली ना, की मग ते काम ‘बोजा’ न बनता आनंदाचा स्त्रोत बनतं..समाधीची अनुभुती देणारं ठरतं..खुप कमी माणसं अशी भाग्यवान असतात..अशाच काही सुदैवी लोकांपैकी एक आहेत माझे ज्येष्ठ […]
मला एक प्रश्न पडलाय…..उत्तर सापडलं, माझ्या पुरतं पटलं देखील……तरी पण एकदा तुमचंही मत घ्यावं म्हणून तुम्हालाही विचारतो.. “महाराष्ट्राचं दैवत.. प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रिय कुलावतंस.. सिंहासनाधीश्वर.. गो ब्राम्हण प्रति पालक.. राजाधीराज ‘छत्रपती’ शिवाजी महाराज” यांच्या उपाधीतील ‘छत्रपती’ हा शब्द, ‘छत्रपती’ की ‘क्षेत्रपती’..?” ‘क्षेत्र’ म्हणजे एखादा मोठा, विस्तृत प्रदेश आणि त्याचा अधिपती, राजा ‘क्षेत्रपती’ असणं योग्य की ‘छत्रपती’? […]
एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. नंतर काही दिवसांनी त्याच तरुणाने त्या श्रीमंत गृहस्थाकडे येऊन नवीन उद्योगासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली. ही विनंती त्या श्रीमंत गृहस्थाने तात्काळ मान्य केली आणि तशी मदतही दिली. तरुणाने त्याला आश्चर्याने विचारले, ‘या आधी मी मामुली […]
प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…! भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’ भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची […]
पण आजच्या काळात ती स्थिरता मिळविणे जवळ- जवळ अशक्य आहे कारण कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवण, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण आणि प्रलोभनांच्या आहरी न जाणं सोप्प नसतं. सर्वसामान्य माणसांना हे शक्य होत नाही कारण सर्वसामान्य माणसे आपल्या सोयीनुसार आपल्या पाप-पूण्याच्या व्याख्या बदलत असतात. […]
मला मंत्रालयात काही कामानिमित्त अनेकदा ( नाईलाजाने) जावं लागतं.. तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक, बॉडी लॅंग्वेज, जनतेला तुच्छ समजण्याची ब्रिटीशकालीन सवय अनुभवली की पुन्हा इथं पाय ठेवू नये असं वाटतं..अगदी ‘माझं सरकार’ आलं असलं तरीही.. मंत्रालयाच्या (नांव बदललं तरी ते सचिवालयच आहे हे कोणीही कबूल करेल) इमारतीच्या रचनेपासूनच सामान्य जनतेची पिळवणूक होते. नक्की कोणत्या मार्गाने जायचे व कोणत्या […]
ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी […]
तीन तरूणींचं सेल्फीच वेड मुंबईत एका तरुणीचा आणि एका निधड्या छातीच्या तरुणाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलं. सेल्फीच्या वेडाने सध्या म्हातार्यांीपासून- तारूणांपर्यत सार्यां नाच पछाडलेले आहे. याला अपवाद फक्त ते आहेत जे मोबाईलचा वापर करत नाहीत. तंत्रज्ञानापासून दूर राहणारे आज खर्याु अर्थाने सुखी आहेत असं म्ह्णण्याची वेळ आता जवळ आली आहे. सेल्फीच्या नादात हल्ली तरुणमंडळी फक्त स्वतःतील […]
देशात आणि राज्यात स्त्रियांवरील आत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत. प्रसारमाध्यमे ही ते वाद चवीने चघळ्त आहेत. या सर्वात मुळ प्रश्न नेहमी सारखाच बाजुला पडत आहे. या सर्व घटनांसाठी पोलीस सुरक्षा सबंधी मंत्री आणि अधिकारी यांच्यासह खुद्द स्त्रियांनाही आरोपीच्या पिंजर्यात उभं करून या समस्या सुटणार […]
मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता. आता प्रश्न हा होता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येच प्रमाण का वाढत असाव ? त्याच मुळ कारण आहे आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती. आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा आपल्या देशातील स्त्रियांना ह्जारो वर्षापूर्वीपासून […]