दिनांक २८ मे म्हणजे एका तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची जयंती अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यसमरातील ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यात स्वा. सावरकरांचं खूप वरचं स्थान आहे. ज्या व्यक्तिमत्वाला कोठी कोटी प्रणाम केले तरी कमी पडतील अशा या स्वा. सावरकरांच्या स्मृतीपुढे त्यांच्या या जन्मदिनी नतमस्तक होऊ या. कारण स्वा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हेत तर ते म्हणजे मध्यान्हीचा तळपता क्रांती सूर्यच होते. […]
प्रसारमाध्यमे हा भारतीय व्यवस्थेचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रसारमाध्यमांनी प्रत्येक वेळी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या काळात प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. […]
‘आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे. […]
स्वच्छता हा एक मनाचा आरसा आहे. ही स्वच्छता स्वतःपुरती ठेवून चालणार नाही. फक्त आपलेच नाही तर देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास स्वच्छतेला पहिला मान दिला पाहिजे. त्यासाठी प्रथम आपले घर, सभोवतालचा परिसर, आपला गाव, आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे म्हणजे निरनिराळे किडे, माशा, डास, उंदीर यांची पैदास होणार नाही. त्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. […]
माझे वडील डॉक्टर होते तसेच काँग्रेसचे पुढारीही होते. काही काळ त्यांनी आमदारकीही भूषवली. मीही डॉक्टर होऊन त्यांची जागा घ्यावी आणि आपल्याला शांत मनाने निवृत्त होता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकाची आवड असूनही शाळेत कधी अभिनय केला नाही. […]
कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची. […]
सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते. […]
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. […]
तरुण मुले खास करून विद्यार्थी जेंव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न हमेशा खटकत असतो: काय करावे ते समजत नाही . तर कोणता निर्णय घ्यायचा हो ? कि नाही ?…! […]
तुलना करणे योग्य की अयोग्य ? या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि सोपे आहे. तुलना करणे हे चुकीचेच आहे. वागणूक बद्दल बोलायचे झाले तर वागणूक ही माणसाने प्रत्येक लहान मुलांसोबत चांगलीच ठेवायला हवी. कधीही कोणी पण कोणाची तुलना दुसऱ्या व्यक्ती सोबत करू नये. पण दुर्दैवाने ही गोष्ट आपल्या मुलांसोबत दररोज घडत असते. मी अनुभवलेल्या समाजातील काही गोष्टी आपणास सांगणार आहे. […]