प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात; त्यातील काही गुण इतरांसारखे देखील असतात, तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे, निराळे असतात. खरे तर ह्या वेगळ्या गुणांमुळेच ती व्यक्ती ओळखता येते. म्हणूनच, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील वैविध्यपूर्ण गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्ण संच होय. […]
आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. […]
नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो. […]
याने माझा विश्वासघात केला, याने मला फसवलं, ही व्यक्ती विश्वास ठेवण्या लायक नाही, अशा अनेक वाक्यांना आपल्या आयुष्यात केव्हां ना केव्हां स्थान मिळतेच. जगण्याचे रहाटगाडगे बदलत नाही […]
मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही. […]
काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही. […]