दोन व्यक्तींमधील संभाषण वा व्यवहार दोघांच्या मर्यादां दरम्यान होत असतील तर ते ठीक असते. पण अशी मर्यादा ओलांडली गेली की एकाचे दुसर्याविषयीचे मत बदलते. कारण त्या एकाला धक्का बसलेला असतो. योग्य कारण जाणण्यात जर तो कमी पडला तर गैरसमज वाढतो. धक्का बसल्यानंतर त्यामागचे खरे कारण समजून घेणे म्हणूनच आवश्यक असते. यासाठी मन खुले असावे लागते. […]
हरि ॐ ब्रह्मांनी जेव्हा ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा त्या ब्रह्मांडाला संस्कुतीची रित देण्यासाठी आणि संस्कारांचा लेप देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व साकारले ते अस्तित्व म्हणजे गुरु… […]
माधव ज्युलीयन म्हणतात,”कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला.” ह्या ओळी गुणगुणतांना लहानपणी ऐकलेली ससा आणि कासवाची गोष्ट आठवल्याशिवाय रहात नाही. […]
शरिरामध्ये अस्तित्वात असणार्या प्राणशक्ति वर केलेली साधना म्हणजे प्राणभक्ती…. प्राणभक्ती ध्यान केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्या शरिराला आजारांपासुन मुक्ती मिळते. […]
काय केले म्हणजे सकारात्मकता वाढीस लागेल,ह्यावर माझाच मी माझ्याशी मुक्त संवाद साधला.
खरच सांगते ,मनानी मनाशी;स्वत:स्वतःशी साधलेला आजचा संवाद मला सुखाच्या हिंदोळ्यावर झुलवतोय. […]
एक विधुर म्हणून पुरुष कोणती ओळख घेऊन फिरतो सांगा तुम्हीच? त्याची बायको अल्पकाळी जाते म्हणून आपण त्याला अशुभ ठरवतो का? पण स्त्रियांच्याच बाबतीत हे सगळं का? इतर वेळी आपण बोलतो जन्माला येतानाच मृत्यूही घेऊन आलेला असतो माणूस मग अश्याच वेळी ते सगळं कुठे जात, का स्त्रीला कारणीभूत ठरवलं जात कोणाच्या मृत्यूसाठीपण? […]
बुद्धिमुळेच आपल्या आचरणाला सुंदर रीत मिळते. कुठे कसं बोलावं, कुठे कसं वागावं, योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन आलेल्या संकटातुन बाहेर कसं पडावं हे तल्लख बुद्धी मुळेच शक्य होतं… […]
परिसरातील सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन आपण स्वतःला घडवलं. तर त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्या-पाखाळ्या काढणं हे आपल्या स्वधर्माच्या/स्वभावधर्माच्या विरुद्धच होऊन जातं. […]
ज्या प्रमाणे एखादं चक्रीवादळ किंवा त्सुनामी आपल्या बरोबर सगळ्यांना विनाशाकडे घेऊन जाते;तद्वतच आजची पिढी व्यसन नावाच्या चक्रीवादळात पार गुरफटलेली दिसून येते.आजची युवा पिढी स्वत:च स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलतांना दिसत आहे. […]