वैचारिक लेखन
विविध विषयांवरील वैचारिक लेखन
सेल्फी
अनेकजण सागतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात. […]
एखादे पद मलाही द्या हो!
माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे. […]
गंभीर बनू नका
फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही. […]
सुजाण नागरिकत्व म्हणजे काय?
‘ज्या देशाचा नागरिक सुजाण आहे, तो देश समृद्ध आहे.’ या वाक्याने मी लेखाची सुरुवात करीत आहे. त्यातील शब्दांची संकल्पना अशी आहे. नागरिकः सृष्टीमधील घटक सजीव व निर्जीव या प्रकारांमधे विभागता येतात. सजीवांचे वनस्पती व प्राणी यात वर्गीकरण करता येते. प्राण्यांचे मनुष्य व इतर प्राणी असे भाग पाडता येतात. ‘मनुष्य’ या प्राण्याचे पुढील भेद देश, समाज यानुसार […]
व्यंगचित्राची ताकद
भारतामध्ये व्यंगचित्र कलेची फार मोठी परंपरा आहे. १०० वर्षांहून अधिक काळ आपल्या देशात वर्तमानपत्रे व नियतकालिकांमध्ये व्यंगचित्रे, हास्यचित्रे प्रकाशित होत आहेत. पारतंत्र्याच्या काळात राजकीय विषय व समाज प्रबोधन यासाठी ह्या माध्यमाचा प्रामुख्याने उपयोग केला जात असे. मात्र त्या काळात छपाईचे तंत्र फारसे प्रगत नव्हते. […]
अग्रलेखांचा दबदबा
२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. […]
लोकशाहीचे पसायदान
भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे. […]