MENU
नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ड /११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] कविवर्य  ग्रेसांचें कांहीं काव्य  पहा – डोंगरापुढे कल्लोळ, अलिकडलें सर्व निवांत निजतात कसे हे लोक सरणाच्या खाली शांत । – खोल उठे काळाचा गहिवर जळे सतीची चिता एक विराणी घेउन, मृत्यू सदैव फिरतो रिता. – चुकून संध्याकाळी जिवलगाच्या मृत्यूची बातमी आली तर कुणालाही सांगूं नये. – ‘अंगसंग’ याला ग्रेस  […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-क / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] मृत्यूचा उल्लेख असलेली , काव्याची आणखी कांहीं उदाहरणें  पहा – आतां जायाचंच की कवातरी पट्.दिशी वसंत बापट – मरणाच्या मुहूर्तावर ओठीं गाणं ओथंबून यावं. सदानंद रेगे – कोणत्याही क्षणीं आम्ही जीवनाच्या प्रवाहातून मरणाच्या कुरळ्या लाटा कधीच वेगळ्या केल्या नाहींत करूं शकलो नाहीं , करूं इच्छीत नव्हतो आणि हेंही आमच्या […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ब / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ] ऐतिहासिक कवितांमध्ये तर अनेकदा मरणाचे उल्लेख असतातच  – शिवरायाचा सिंह सिहगडिं पडला समरांगणीं मराठा गडी यशाचा धनी   ।। –     कुंजविहारी – खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या उडविन राईराईएवढ्या  ।। – स्वातंत्र्य-युद्धाच्या संदर्भातील पद्यातही  मरणाचे उल्लेख विपुल असतात . भा. रा. तांबे च्या,‘झाशीवाली’ कवितेतील ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-अ /११

मराठी काव्य   :    भाग ८-अ   मराठीत अनेक जुन्यानव्या कवींनी त्यांच्या काव्यात मृत्यूचा उल्लेख केलेला आहे. पाहूं या कांहीं उदाहरणें.   आधुनिक मराठी युगाच्या सुरुवातीच्या काळाच्या संदर्भात भा. रा. तांबे यांचा विचार करावाच लागतो. त्यांच्या अनेक कवितांमध्ये मरणाचा उल्लेख येतो. तें साहजिकच आहे, कारण तांबे यांनी मुलांसाठी काव्य लिहिलें, झाशीच्या राणीवर स्फूर्तीप्रद काव्य लिहिलें, ‘रुद्रास […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-ब/ ११

[ उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य  : ( पुढे चालू ) ]     उर्दू  काव्य: प-ए-फ़ातहा कोई आए क्यों, कोई चार फूल चढ़ाए क्यों कोई आके शम्मा जलाए क्यों, मैं वो बेकसी का मज़ार हूँ  । बहादुरशाह ज़फ़र ( ही गझल ज़फ़र यांची आहे, असें म्हटलें जातें . पण हल्ली , ही वास्तवात मुश्तर खैराबादी यांची आहे, असें मानतात. […]

नाग पंचमी : एक चिंतन

श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा. […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-७-अ /११

भाग-७ :  उर्दू-हिंदी-हिंदुस्तानी काव्य  :    भाग-७-अ  : हिंदी – हिंदुस्तानी काव्य : झर गए पात , बिसर गई टहनी करुण कथा जग से क्या कहनी ? –    निराला – मृषा मृत्यु का भय है जीवन की ही जय है । ( मृषा : To no purpose ) महादेवी वर्मा – – मेरे शव पर वह […]

पद्य आणि मृत्युविचार : भाग-६ / ११

बांगला (बंगाली) काव्य : साहित्याचा नोबल पुरस्कार-प्राप्त गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या एका बंगाली कवितेचें हें भाषांतर पहा – Death is not Extinguishing the light ; It is only putting out the lamp Because the dawn has come.   त्यांच्याच, एका अन्य, ‘Death’ नांवाच्या कवितेचा अंश पहा – O thou the last fulfilment of life Death, […]

कोकणची मुंबई; नको रे बाप्पा !

मुंबई, पुणे किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरातला ऑक्सिजन संपत चाललाय. कोकणात मात्र तो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. भविष्यातील पर्यटन काही बघण्यासाठी कमी आणि निर्मळ प्राणवायू मिळावा म्हणून जास्त होणार आहे याची जाणीव राज्यकर्त्यांनी नसली तरी स्थानिक जनतेने मात्र ठेवायला हवी. स्थानिक लोक्प्रतीनिधिनीही जनतेच्या या भावनांची कदर करून आपले पक्षभेद विसरून कोकणच कोकणत्व टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना तसं करण्यासाठी जनतेनेही (आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही) त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. ही काळाची गरज आहे. […]

1 96 97 98 99 100 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..