मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला. नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. […]
सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता […]
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. लता मंगेशकर, […]
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे अमेरिकेत राहणारे भारतीय-मराठी प्रज्ञावंत गणिती होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते. अभ्यंकर अमेरिकेतील परड्यू विद्यापीठात गणित, संगणक विज्ञान व औद्योगिक अभियांत्रिकीचे प्राध्यापक होते. त्यांचे बीजभूमिती या विषयात विशेष नैपुण्य होते. […]
सागर आर्टस चे सर्वेसर्वा व संस्थापक डॉ. रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्मात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान […]
ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० रोजी नाशिक येथे झाला. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला. तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर […]
ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनादेवी यांनी आपल्या गाण्याची तालीम गिरीजा शंकर चक्रवर्ती यांच्या कडून घेतली. नंतर त्यांनी रामपूर -सहसवास घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसेन खान आणि बनारस घराण्याच्या रसूलन बाई यांच्या कडे गाण्याचे शिक्षण घेतले. […]
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला. मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता. १९८८ साली […]
सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि कल्पक कर्णधार अशी असलेल्या कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू यांना सात कसोटीत ३५० धावाच करता आल्या तरी तब्बल सहा दशके त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले. […]
मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील चतुरस्त्र अभिनेते सुधीर जोशी यांचा जन्म १९४८ रोजी मुंबईत झाला. सुधीर जोशी यांनी मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून अर्थशास्त्रात बी.ए. केले होते. अभिनया कडे वळण्या आधी ते मुंबईतल्या ब्लॅकी ॲड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते. कालांतराने नोकरी सोडून जोशी पूर्ण वेळ अभिनय क्षेत्राकडे वळले. सुधीर जोशी यांनी मराठी सिनेसृष्टीत एक काळ गाजवला होता. […]