नवीन लेखन...

दिल अपना और प्रीत पराई

दिल अपना और प्रीत पराई हा चित्रपट ४ मार्च १९६० रोजी प्रदर्शित झाला.

या चित्रपटाचे दिग्दर्शक होते किशोर साहू. हसरत जयपुरी आणि शैलेंद्र या गीतकारांनी लिहिलेल्या सदाबहार गीतांना ज्येष्ठ संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं. गानसरस्वती लता मंगेशकर, आशा भोसले आणि महंमद रफी यांच्या सुरेल आवाजात या सिनेमातली सगळीच गाणी त्याकाळी रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालामध्ये अजरामर झाली. या सिनेमात राजकुमार, मीनाकुमारी, नादिरा, हेलन, ओमप्रकाश, नाझ, सुलोचना हे कलाकार होते. सिनेमात राजकुमार एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत असतो. मीनाकुमारी याच हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून रुजू होते. सहवासानं दोघांचे प्रेमाचे धागे जुळून येतात. आईच्या आग्रहामुळे नादिरा या श्रीमंत मुलीबरोबर राजकुमारचं बळजबरीनं लग्न होतं. त्यामुळे घरात सतत संघर्ष होत असतो. एके दिवशी राजकुमार आणि नादिरा यांचं कडाक्याचं भांडण होतं; आणि नादिरा माहेरी निघून जाते. मीनाकुमारी मात्र राजकुमारच्या वृद्ध आईची मनापासून सेवा करत असते. राजकुमार आजारी पडल्यावर नादिरा पुन्हा घरी येते. राजकुमार मात्र मीनाकुमारीस सतत म्हणत असतो की मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळे नादिरा मीनाकुमारीचा खून करण्याचं कारस्थान रचते. एके दिवशी नादिरा मीनाकुमारीला आपल्या गाडीतून फिरायला दूर समुद्रकिनारी घेऊन जाते.

वेगात गाडी चालवून ती मीनाकुमारीला गाडीतून ढकलून देणार असते. इतक्यात तिची गाडी कड्यावरून कोसळून समुद्रात पडते. यात नादिराचा मृत्यू होतो. मागून राजकुमार येत असतो. तो पाण्यात उडी मारून मीनाकुमारीला वाचवतो. अशी या सिनेमाची ही कथा. या सिनेमातील ‘दिल अपना और प्रीत पराई’ हे लतादीदींनी गायलेलं माझ्या आवडीचं खास गाणं दिल अपना और प्रीत पराई किसने है ये रीत बनाई आँधीने एक दीप जलाया और पानीमे आग लगाई है दर्द ऐसा के सहना है मुष्कील दुनियावालोंसे कहना है मुष्कील घिरके आया है तुफान ऐसा बचके साहिलपे रहना है मुष्कील दिल को संभाला न दामन बचाया फैली जब आग तब होश आया गमके मारे पुकारे किसे हम हमसे बिछाडा हमारा ही साया या गाण्याची नजाकत आजही माझ्या मनात सतत रुंजी घालते. या सिनेमातली ‘मेरा दिल अब तेरा ओ साजना’, ‘शिशाए दिल इतना ना उछालो’, ‘अजीब दास्ता है ये कहां शुरू कहां खतम’, ‘इतनी बडी महफील और एक दिल किसको दू’.

बी. आर. कुलकर्णी

संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4386 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..